Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने आवश्यक उपाययोजना राबवल्या असून, मंत्रालयातील पाणी पिण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फतही पाण्याची सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती विभागाने दिली आहे. (Mantralaya Water)



पाण्याच्या ३० टाक्यांची संपूर्ण स्वच्छता :


सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ जुलै २०२६ रोजी मंत्रालयातील जमिनीखालील पाण्याची टाकी तसेच मुख्य आणि विस्तार इमारतींवरील एकूण ३० पाण्याच्या टाक्यांची संपूर्ण साफसफाई केली. यापुढे सर्व टाक्यांची दर १५ दिवसांनी नियमित स्वच्छता करण्याच्या सूचनांनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (Mantralaya Water)



BMCच्या प्रयोगशाळेचा अहवाल; पाणी पिण्यास योग्य : 


मंत्रालयातील पाण्याचे नमुने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. २९ एप्रिल २०२६ आणि १० जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. याशिवाय, महापालिकेने मंत्रालयात येणाऱ्या पाण्याचे तसेच जमिनीखालील आरसीसी टाकीमध्ये साठवलेल्या पाण्याचे नमुने तपासले असून, १० जुलैच्या अहवालानुसार हे पाणीही सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Mantralaya Water)



३३ वॉटर प्युरिफायरचे सर्व्हिसिंग पूर्ण :


पाणीपुरवठ्याची गुणवत्ता अधिक चांगली ठेवण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य आणि विस्तार इमारतीतील एकूण ३३ जलशुद्धीकरण यंत्रणांचे (वॉटर प्युरिफायर) सर्व्हिसिंग पूर्ण करण्यात आले आहे. (Mantralaya Water)



तज्ज्ञ समितीकडून स्वतंत्र तपासणी सुरू :


पाणीपुरवठ्याबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ११ जुलै २०२६ रोजी मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली. या समितीने १३ जुलै रोजी मंत्रालयातील जमिनीखालील टाकी, टेरेसवरील टाक्या तसेच मुख्य आणि विस्तार इमारतीतील प्रत्येक मजल्यावरील पाण्याचे नमुने सलग तीन दिवस संकलित केले असून, त्याचा सविस्तर अहवाल लवकरच अपेक्षित आहे. (Mantralaya Water)



प्रसाधनगृहांचीही नियमित स्वच्छता :


सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले की, मंत्रालयाच्या मुख्य आणि विस्तार इमारतीतील एकूण ८८ प्रसाधनगृहांची स्वच्छता नियुक्त कंत्राटदारामार्फत निश्चित वेळापत्रकानुसार दररोज नियमितपणे केली जात आहे. मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि महापालिकेच्या अहवालामुळे पाणीपुरवठा सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून, स्वतंत्र तज्ज्ञ समितीच्या अंतिम अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mantralaya Water)

Comments
Add Comment

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Wardha Crime : वर्ध्यातील रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांचे जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश

MUMBAI : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात घडलेली १२ वर्षीय मुलीवरील अत्यंत अमानुष क्रूरता आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण