Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २१ जुलै ते २६ जुलैदरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.(Rain News)



सध्या गुजरात किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागासह पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २१ ते २५ जुलैदरम्यान नैऋत्य मोसमी वारे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रावर सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.



२२ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट कायम आहे.


२३ जुलै रोजी कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. २४ जुलै रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट आहे. २५ जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे.



कोकणातील किनारी भाग आणि घाट परिसरात पुढील दोन ते तीन दिवस वाऱ्याचा वेग वाढण्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भात काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Wardha Crime : वर्ध्यातील रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांचे जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश

MUMBAI : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात घडलेली १२ वर्षीय मुलीवरील अत्यंत अमानुष क्रूरता आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण