Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २१ जुलै ते २६ जुलैदरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.(Rain News)



सध्या गुजरात किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागासह पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २१ ते २५ जुलैदरम्यान नैऋत्य मोसमी वारे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रावर सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.



२२ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट कायम आहे.


२३ जुलै रोजी कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. २४ जुलै रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट आहे. २५ जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे.



कोकणातील किनारी भाग आणि घाट परिसरात पुढील दोन ते तीन दिवस वाऱ्याचा वेग वाढण्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भात काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.