Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता


मुंबई : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती, पदोन्नती आणि प्रशासकीय चौकटीत तब्बल पाच दशकांनंतर बदल घडवून आणण्यात आला आहे. महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध आणि सेवाप्रवेश नियम (रिक्रूटमेंट रूल्स - आर. आर.) लागू करण्यासाठी राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सन १९७७ नंतर पहिल्यांदाच झालेल्या या व्यापक बदलांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीतील अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न आता कायमचे मार्गी लागणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. (Chandrashekar Bawankule)



मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल विभागाच्या नवीन आकृतीबंधाला आणि सेवाप्रवेश नियमावलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली आहे. १९७७ नंतर म्हणजेच तब्बल ५० वर्षांनंतर महसूल रचनेत हा बदल घडवण्यात आला आहे. या निर्णयामुळे विभागातील सेवाज्येष्ठता, पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर होऊन प्रशासकीय कामकाजात सुटसुटीतपणा व पारदर्शकता येईल.



दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (SRA) अधिकारी आणि चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) गैरव्यवहाराच्या आरोपांवर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी सांगितले की, एसआरएमध्ये वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी आल्यास त्यांची सखोल चौकशी केली जाईल. यातील नगरविकास विभागाशी संबंधित तक्रारींची चौकशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील, तर महसूल विभागाशी संबंधित चौकशी स्वतः महसूल विभाग करेल आणि दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.(Chandrashekar Bawankule)



राजकीय पोळी भाजण्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन


विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका हा लोकशाहीचा भाग असला तरी देशातील १४० कोटी जनतेने मोदींना सलग तिसऱ्यांदा कौल दिला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. तसेच 'नीट' परीक्षा गोंधळाचा उल्लेख करत बावनकुळे यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनावर टीका केली. पेपरफुटीच्या घटनेनंतर सरकारने तातडीने त्रुटी दूर करून स्वतःहून कठोर पावले उचलली आहेत. असे असतानाही तरुणांना भडकवण्यासाठी व राजकीय पोळी भाजण्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी दगडफेकीसाठी दगड गोळा केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू असलेल्या या षड्यंत्राची व असामाजिक तत्त्वांची सखोल चौकशी सुरू असल्याचेही महसूलमंत्र्यांनी नमूद केले.(CJP Protest)

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Wardha Crime : वर्ध्यातील रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांचे जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश

MUMBAI : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात घडलेली १२ वर्षीय मुलीवरील अत्यंत अमानुष क्रूरता आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण