तुम्ही अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केलेले अन्न खाताय? तर आताच व्हा सावध नाहीतर...

मुंबई: आजकाल जेवण पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा(aluminium foil) वापर खूप वाढला आहे. मात्र ही अॅल्युमिनियम फॉईल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. दरम्यान, यामुळे काय नुकसान होते याची माहिती फार कमी लोकांना असते. तुम्हीही जर जेवण अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करत असाल तर जाणून घ्या यामुळे काय नुकसान होते ते.


तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलचा वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण अॅल्युमिनियम फॉईलचा वापर जेवण गरम ठेवण्यासाठी करतो तेव्हा गरम जेवण अॅल्युमिनियम फॉईलच्या संपर्कात येते आणि ती तत्वे जेवणात उतरतात. दीर्घकाळ असे जेवण जेवल्याने विस्मरणाचा धोका वाढतो.



काय म्हणतात तज्ञ?


तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करणे योग्य आहे मात्र दीर्घकाळ याचा वापर करत राहिल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खासकरून जेव्हा अॅल्युमिनियम फॉईलमध्ये अॅसिडिक आणि खारट पदार्थ दीर्घकाळ ठेवले जातात. यातील केमिकल रिअॅक्शनमुळे जेवणाची चव बदलू शकते. तसेच लीव्हर आणि किडनीशी संबंधित समस्या होऊ शकतात.



गंभीर आजारांचा धोका


तज्ञांच्या मते, अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवलेले जेवण दीर्घकाळ सेवन करत राहिल्यास पुरुषांमध्ये इंफर्टिलिटीची गंभीर समस्या वाढे. यामुळे हाडांच्या विकासावरही परिणाम होतो. तसेच किडनीचीही समस्या सतावू शकते. याशिवाय अॅल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवल्याने तसेच ठेवल्याने आणि खाल्ल्याने शरीरात अनेक धोकादायकतत्वे जमा होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अस्थमा, लिव्हरच्या समस्या उद्भवतात.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही