तुम्ही अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केलेले अन्न खाताय? तर आताच व्हा सावध नाहीतर...

  175

मुंबई: आजकाल जेवण पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा(aluminium foil) वापर खूप वाढला आहे. मात्र ही अॅल्युमिनियम फॉईल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. दरम्यान, यामुळे काय नुकसान होते याची माहिती फार कमी लोकांना असते. तुम्हीही जर जेवण अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करत असाल तर जाणून घ्या यामुळे काय नुकसान होते ते.


तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलचा वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण अॅल्युमिनियम फॉईलचा वापर जेवण गरम ठेवण्यासाठी करतो तेव्हा गरम जेवण अॅल्युमिनियम फॉईलच्या संपर्कात येते आणि ती तत्वे जेवणात उतरतात. दीर्घकाळ असे जेवण जेवल्याने विस्मरणाचा धोका वाढतो.



काय म्हणतात तज्ञ?


तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करणे योग्य आहे मात्र दीर्घकाळ याचा वापर करत राहिल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खासकरून जेव्हा अॅल्युमिनियम फॉईलमध्ये अॅसिडिक आणि खारट पदार्थ दीर्घकाळ ठेवले जातात. यातील केमिकल रिअॅक्शनमुळे जेवणाची चव बदलू शकते. तसेच लीव्हर आणि किडनीशी संबंधित समस्या होऊ शकतात.



गंभीर आजारांचा धोका


तज्ञांच्या मते, अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवलेले जेवण दीर्घकाळ सेवन करत राहिल्यास पुरुषांमध्ये इंफर्टिलिटीची गंभीर समस्या वाढे. यामुळे हाडांच्या विकासावरही परिणाम होतो. तसेच किडनीचीही समस्या सतावू शकते. याशिवाय अॅल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवल्याने तसेच ठेवल्याने आणि खाल्ल्याने शरीरात अनेक धोकादायकतत्वे जमा होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अस्थमा, लिव्हरच्या समस्या उद्भवतात.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.