तुम्ही अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केलेले अन्न खाताय? तर आताच व्हा सावध नाहीतर...

मुंबई: आजकाल जेवण पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा(aluminium foil) वापर खूप वाढला आहे. मात्र ही अॅल्युमिनियम फॉईल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. दरम्यान, यामुळे काय नुकसान होते याची माहिती फार कमी लोकांना असते. तुम्हीही जर जेवण अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करत असाल तर जाणून घ्या यामुळे काय नुकसान होते ते.


तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलचा वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण अॅल्युमिनियम फॉईलचा वापर जेवण गरम ठेवण्यासाठी करतो तेव्हा गरम जेवण अॅल्युमिनियम फॉईलच्या संपर्कात येते आणि ती तत्वे जेवणात उतरतात. दीर्घकाळ असे जेवण जेवल्याने विस्मरणाचा धोका वाढतो.



काय म्हणतात तज्ञ?


तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करणे योग्य आहे मात्र दीर्घकाळ याचा वापर करत राहिल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खासकरून जेव्हा अॅल्युमिनियम फॉईलमध्ये अॅसिडिक आणि खारट पदार्थ दीर्घकाळ ठेवले जातात. यातील केमिकल रिअॅक्शनमुळे जेवणाची चव बदलू शकते. तसेच लीव्हर आणि किडनीशी संबंधित समस्या होऊ शकतात.



गंभीर आजारांचा धोका


तज्ञांच्या मते, अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवलेले जेवण दीर्घकाळ सेवन करत राहिल्यास पुरुषांमध्ये इंफर्टिलिटीची गंभीर समस्या वाढे. यामुळे हाडांच्या विकासावरही परिणाम होतो. तसेच किडनीचीही समस्या सतावू शकते. याशिवाय अॅल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवल्याने तसेच ठेवल्याने आणि खाल्ल्याने शरीरात अनेक धोकादायकतत्वे जमा होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अस्थमा, लिव्हरच्या समस्या उद्भवतात.

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या