Pune news : पुण्यात येरवडा भागात १५ ते २० गाड्यांची तोडफोड

  89

पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात (Pune) सातत्याने गुन्हेगारीच्या घटना (Crime incidents) घडत आहेत. आरोपींसाठी अत्यंत कडक असलेल्या पुण्याच्या येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) तर चक्क आरोपी पळून गेल्याच्या घटना देखील घडल्या. त्यातच आता पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून हातात कोयते किंवा शस्त्र घेऊन वाहनांची तोडफोड (Car vandalized) करण्यात येत आहे. असाच प्रकार काल रात्री पुण्यातल्या येरवडा परिसरात घडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.


पुण्यातल्या येरवडा भागात काल रात्री काही अज्ञातांकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यात १५ ते २० गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कार, दुचाकी आणि रिक्षाचा समावेश आहे. अशी तोडफोड करणार्‍या लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अयशस्वी ठरत आहेत, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.


येरवडा परिसरातील काही नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी अद्याप तोडफोड करणार्‍या कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर पावले उचलावीत, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या