Pune news : पुण्यात येरवडा भागात १५ ते २० गाड्यांची तोडफोड

पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात (Pune) सातत्याने गुन्हेगारीच्या घटना (Crime incidents) घडत आहेत. आरोपींसाठी अत्यंत कडक असलेल्या पुण्याच्या येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) तर चक्क आरोपी पळून गेल्याच्या घटना देखील घडल्या. त्यातच आता पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून हातात कोयते किंवा शस्त्र घेऊन वाहनांची तोडफोड (Car vandalized) करण्यात येत आहे. असाच प्रकार काल रात्री पुण्यातल्या येरवडा परिसरात घडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.


पुण्यातल्या येरवडा भागात काल रात्री काही अज्ञातांकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यात १५ ते २० गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कार, दुचाकी आणि रिक्षाचा समावेश आहे. अशी तोडफोड करणार्‍या लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अयशस्वी ठरत आहेत, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.


येरवडा परिसरातील काही नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी अद्याप तोडफोड करणार्‍या कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर पावले उचलावीत, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे.


Comments
Add Comment

पुण्यात पसरला विषारी धूर, ५ विद्यार्थी रुग्णालयात; २० हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजला सुट्टी, एक कंपनी बंद

पुणे : पुण्यात लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात आहे. या

Nagpur Blast : नागपूर कारखाना स्फोट; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला, आणि

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या