मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईड दाऊद इब्राहिमला दिले विष? सोशल मीडियावर दावा

नवी दिल्ली: मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत(dawood) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. त्याच्याबद्दल असा दावा केला जात आहे की दाऊदला कराचीमध्ये विष देण्यात आले आहे. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे येथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.


सोशल मीडियावर अनेक युजर्सकडून दावा केला जात आहे की दाऊद इब्राहिमला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असा दावा केला जातोय की एका अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिले. यामुळेच दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


विष दिल्या गेल्याच्या बातमीला अद्याप कोणाकडूनही दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, असेही सांगितले जात आहे की मुंबई पोलीस अधिकारी दाऊदचे जवळच्या नातेवाईकांकडूनही याबाबतची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.



पाकिस्तानी मीडियाने दिला सोशल मीडियाचा हवाला


जिओ टीव्ही न्यूजने सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांचा हवाला देताना सांगितले की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत अफवा सुरू आहे. यात दाऊदची स्थिती गंभीर असल्याने त्याला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचे कारण विष दिल्याचे सांगितले जात आहे.



पाकिस्तानात सोशल मीडिया सर्व्हर डाऊन


याबाबतच पाकिस्तानी पत्रकार आरजू काजमीनेही यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांबाबतचा विषय होता. याबाबतच्या घटनेबाबत बोलताना सांगितले की पाकिस्तानात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काम करत नाहीयेत. यूट्यूब, गुगल आदि सर्व्हर डाऊन आहेत.



मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड


१९९३मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल ब्लास्टचा मास्टरमाईंड तो होता. स्फोट घडवून आणल्यानंतर तो दुबईला पळून गेला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात राहत आहे. तेथे तो कुटुंबियांसोबत राहत आहे. त्याच्याविरोधात भारतात दहशतवादी हल्ला, हत्या, अपहरण, सुपारी हत्या, संगठित अपराध, ड्रग्सत, हत्यांरांची तस्करी अशी अनेक प्रकरणे आहेत. २००३मध्ये त्याला जागतिक दहशतवाही म्हणून घोषित करण्यात आले.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर