Health: फळांचा ज्यूस की फळे? थंडीमध्ये काय खाणे आहे योग्य

मुंबई: शरीराला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या डाएटमध्ये फळांचा समावेश करतात. मात्र अनेकदा असा सवाल येतो की फळ खाणे जास्त फायदेशीर की फळांचा ज्यूस पिणे. या दोघांपैकी काय निवडले पाहिजे. फळे स्वादिष्ट, ताजी तसेच व्हिटामिन आणि अँटी ऑक्सिडंटनी भरलेली असतात. तुम्ही ती अशीच खाऊ शकता अथवा ज्यूस काढून पिऊ शकता.



अख्खी फळे खाण्याचे फायदे


अख्खं फळ खाल्लायाने शरीरास मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. यामुळे पाचनशक्ती सुधारते तसेच ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. ताजी फळे खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटामिन, अँटी ऑक्सिडंट तसेच फायटोकेमिकल्स मिळतात. फळे खाल्ल्याने लठ्ठपाणी तसेच जुन्या आजारांचा धोका कमी होतो. फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीरास भरपूर आहार मिळतो. सोबतच फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. फळांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच फायबरचे प्रमाण अधिक असते. फळे वजन घटवण्यास फायदेशीर ठरतात. यात जांभूळ, सफरचंद, नासपती, आंबट फळे आणि द्राक्षांचा समावेश होतो.



फळांच्या रसाचे फायदे आणि नुकसान


फळांचा रस एक अथवा अधिक फळे मिक्स करून बनवला जातो. ही फळांची सेवन करण्याची सोपी पद्धत आहे. दरम्यान, संपूर्ण फळातून मिळणारे फायबरच्या तुलनेत रसातून कमी मिळते. जर तुम्ही ज्यूस पित असाल तर हे लक्षात ठेवले पाहिजे की तो पॅक्ड ज्यूस नसावा.



वजन घटवण्यासाठी ज्यूस प्यायला पाहिजे?


भले ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते मात्र असा कोणताही दावा नाही की ज्यूस प्यायल्याने वजन घटवण्यास मदत मिळते. वजन घटवण्यासाठी फळांचा रस हा उत्तम मार्ग नाही. अख्खं फफ खाण्यावजी ज्यूस प्यायल्यास एकूण मिळून अधिक कॅलरी शरीरात जाते. फळ आणि फळांचा रस दोन्ही चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. मात्र अख्खं फळ कधीही शरीरासाठी चांगले. मात्र जर तुम्ही फळांचा ज्यूस पित असाल तर त्यात साखर असणार नाही याची काळजी घ्या.

Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :