Health: फळांचा ज्यूस की फळे? थंडीमध्ये काय खाणे आहे योग्य

  149

मुंबई: शरीराला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या डाएटमध्ये फळांचा समावेश करतात. मात्र अनेकदा असा सवाल येतो की फळ खाणे जास्त फायदेशीर की फळांचा ज्यूस पिणे. या दोघांपैकी काय निवडले पाहिजे. फळे स्वादिष्ट, ताजी तसेच व्हिटामिन आणि अँटी ऑक्सिडंटनी भरलेली असतात. तुम्ही ती अशीच खाऊ शकता अथवा ज्यूस काढून पिऊ शकता.



अख्खी फळे खाण्याचे फायदे


अख्खं फळ खाल्लायाने शरीरास मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. यामुळे पाचनशक्ती सुधारते तसेच ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. ताजी फळे खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटामिन, अँटी ऑक्सिडंट तसेच फायटोकेमिकल्स मिळतात. फळे खाल्ल्याने लठ्ठपाणी तसेच जुन्या आजारांचा धोका कमी होतो. फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीरास भरपूर आहार मिळतो. सोबतच फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. फळांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच फायबरचे प्रमाण अधिक असते. फळे वजन घटवण्यास फायदेशीर ठरतात. यात जांभूळ, सफरचंद, नासपती, आंबट फळे आणि द्राक्षांचा समावेश होतो.



फळांच्या रसाचे फायदे आणि नुकसान


फळांचा रस एक अथवा अधिक फळे मिक्स करून बनवला जातो. ही फळांची सेवन करण्याची सोपी पद्धत आहे. दरम्यान, संपूर्ण फळातून मिळणारे फायबरच्या तुलनेत रसातून कमी मिळते. जर तुम्ही ज्यूस पित असाल तर हे लक्षात ठेवले पाहिजे की तो पॅक्ड ज्यूस नसावा.



वजन घटवण्यासाठी ज्यूस प्यायला पाहिजे?


भले ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते मात्र असा कोणताही दावा नाही की ज्यूस प्यायल्याने वजन घटवण्यास मदत मिळते. वजन घटवण्यासाठी फळांचा रस हा उत्तम मार्ग नाही. अख्खं फफ खाण्यावजी ज्यूस प्यायल्यास एकूण मिळून अधिक कॅलरी शरीरात जाते. फळ आणि फळांचा रस दोन्ही चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. मात्र अख्खं फळ कधीही शरीरासाठी चांगले. मात्र जर तुम्ही फळांचा ज्यूस पित असाल तर त्यात साखर असणार नाही याची काळजी घ्या.

Comments
Add Comment

गणेश विसर्जनासाठी आता आखणार चिन्हांकित रेखा

मुंबईतील समुद्रात पालिका बसवणार दिशानिर्देशक सौर दिवे मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेकजण

ऑनलाइन ११ वी प्रवेशासाठीची नोंदणी पुरेशा प्रमाणात

शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील

'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे'चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

मुंबई: महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम