Health: फळांचा ज्यूस की फळे? थंडीमध्ये काय खाणे आहे योग्य

मुंबई: शरीराला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या डाएटमध्ये फळांचा समावेश करतात. मात्र अनेकदा असा सवाल येतो की फळ खाणे जास्त फायदेशीर की फळांचा ज्यूस पिणे. या दोघांपैकी काय निवडले पाहिजे. फळे स्वादिष्ट, ताजी तसेच व्हिटामिन आणि अँटी ऑक्सिडंटनी भरलेली असतात. तुम्ही ती अशीच खाऊ शकता अथवा ज्यूस काढून पिऊ शकता.



अख्खी फळे खाण्याचे फायदे


अख्खं फळ खाल्लायाने शरीरास मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. यामुळे पाचनशक्ती सुधारते तसेच ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. ताजी फळे खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटामिन, अँटी ऑक्सिडंट तसेच फायटोकेमिकल्स मिळतात. फळे खाल्ल्याने लठ्ठपाणी तसेच जुन्या आजारांचा धोका कमी होतो. फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीरास भरपूर आहार मिळतो. सोबतच फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. फळांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच फायबरचे प्रमाण अधिक असते. फळे वजन घटवण्यास फायदेशीर ठरतात. यात जांभूळ, सफरचंद, नासपती, आंबट फळे आणि द्राक्षांचा समावेश होतो.



फळांच्या रसाचे फायदे आणि नुकसान


फळांचा रस एक अथवा अधिक फळे मिक्स करून बनवला जातो. ही फळांची सेवन करण्याची सोपी पद्धत आहे. दरम्यान, संपूर्ण फळातून मिळणारे फायबरच्या तुलनेत रसातून कमी मिळते. जर तुम्ही ज्यूस पित असाल तर हे लक्षात ठेवले पाहिजे की तो पॅक्ड ज्यूस नसावा.



वजन घटवण्यासाठी ज्यूस प्यायला पाहिजे?


भले ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते मात्र असा कोणताही दावा नाही की ज्यूस प्यायल्याने वजन घटवण्यास मदत मिळते. वजन घटवण्यासाठी फळांचा रस हा उत्तम मार्ग नाही. अख्खं फफ खाण्यावजी ज्यूस प्यायल्यास एकूण मिळून अधिक कॅलरी शरीरात जाते. फळ आणि फळांचा रस दोन्ही चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. मात्र अख्खं फळ कधीही शरीरासाठी चांगले. मात्र जर तुम्ही फळांचा ज्यूस पित असाल तर त्यात साखर असणार नाही याची काळजी घ्या.

Comments
Add Comment

‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा - २०२५’ : परिमंडळनिहाय सर्वोत्तम कोणती ठरली नैसर्गिक, कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळे

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदाचा श्रीगणेशोत्सव गणेशभक्तांसोबतच प्रशासनासाठी देखील वेगळा होता. पर्यावरणपूरक

मनसे-ठाकरे युतीला काँग्रेसचा विरोध! काँग्रेसला एकटे पाडण्याचा शिजतोय कट! ‘मविआ’ फुटण्याच्या उंबरठ्यावर?

काँग्रेसला एकटे पाडण्यासाठी संजय राऊतांनी साधला शरद पवारांशी संपर्क मुंबई: विधानसभा निवडणुकीत मोठा फटका

भाजपचा राऊतांवर हल्लाबोल! बीकेसीला जा, विकासाची प्रगती पाहा; नवनाथ बन यांचा थेट 'तिकीट' देण्याचा प्रस्ताव

मुंबई: भाजप मीडिया सेलचे प्रमुख नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत

आरे कारशेडसाठी टीका करणाऱ्या लेखिकेवर 'यू-टर्न'चा आरोप; सोशल मीडियावर टीका

आधी विरोध, आता कौतुक! 'मेट्रो ३' च्या प्रवासावर 'शोभा डे' अडचणीत मुंबई: मुंबई मेट्रो-३ (अ‍ॅक्वा लाइन) च्या नुकत्याच

पवईमध्ये कार अपघातात मजुराचा मृत्यू, अपघातानंतर निवृत्त अधिकाऱ्याने दाखवली माणुसकी

मुंबई: पवई पोलिसांनी एका ७४ वर्षीय निवृत्त संरक्षण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या

सॅमसंगचा नवीन बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम१७ लाँच

मुंबई : कोरियन टेक दिग्गज सॅमसंगने आज भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय एम-सिरीज अंतर्गत नवीन बजेट स्मार्टफोन