Health: फळांचा ज्यूस की फळे? थंडीमध्ये काय खाणे आहे योग्य

मुंबई: शरीराला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या डाएटमध्ये फळांचा समावेश करतात. मात्र अनेकदा असा सवाल येतो की फळ खाणे जास्त फायदेशीर की फळांचा ज्यूस पिणे. या दोघांपैकी काय निवडले पाहिजे. फळे स्वादिष्ट, ताजी तसेच व्हिटामिन आणि अँटी ऑक्सिडंटनी भरलेली असतात. तुम्ही ती अशीच खाऊ शकता अथवा ज्यूस काढून पिऊ शकता.



अख्खी फळे खाण्याचे फायदे


अख्खं फळ खाल्लायाने शरीरास मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. यामुळे पाचनशक्ती सुधारते तसेच ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. ताजी फळे खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटामिन, अँटी ऑक्सिडंट तसेच फायटोकेमिकल्स मिळतात. फळे खाल्ल्याने लठ्ठपाणी तसेच जुन्या आजारांचा धोका कमी होतो. फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीरास भरपूर आहार मिळतो. सोबतच फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. फळांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच फायबरचे प्रमाण अधिक असते. फळे वजन घटवण्यास फायदेशीर ठरतात. यात जांभूळ, सफरचंद, नासपती, आंबट फळे आणि द्राक्षांचा समावेश होतो.



फळांच्या रसाचे फायदे आणि नुकसान


फळांचा रस एक अथवा अधिक फळे मिक्स करून बनवला जातो. ही फळांची सेवन करण्याची सोपी पद्धत आहे. दरम्यान, संपूर्ण फळातून मिळणारे फायबरच्या तुलनेत रसातून कमी मिळते. जर तुम्ही ज्यूस पित असाल तर हे लक्षात ठेवले पाहिजे की तो पॅक्ड ज्यूस नसावा.



वजन घटवण्यासाठी ज्यूस प्यायला पाहिजे?


भले ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते मात्र असा कोणताही दावा नाही की ज्यूस प्यायल्याने वजन घटवण्यास मदत मिळते. वजन घटवण्यासाठी फळांचा रस हा उत्तम मार्ग नाही. अख्खं फफ खाण्यावजी ज्यूस प्यायल्यास एकूण मिळून अधिक कॅलरी शरीरात जाते. फळ आणि फळांचा रस दोन्ही चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. मात्र अख्खं फळ कधीही शरीरासाठी चांगले. मात्र जर तुम्ही फळांचा ज्यूस पित असाल तर त्यात साखर असणार नाही याची काळजी घ्या.

Comments
Add Comment

रस्त्यांच्या कडेसह मोकळ्या जागांवर वृक्षरोपणावर अधिक भर

बांबूची झाडे अधिक प्रमाणात लावली जाणार महापालिका बनवणार बांबूच्या झाडांची नर्सरी मुंबई (विशेष

BMC Election: दादरमध्ये भाजपातच उमेदवारीवरून जितू विरुध्द जितू

प्रभाग क्रमांक १९२मध्ये भाजपाला सुटला तरी उमेदवारीवरून जोरदार स्पर्धा मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई

मुंबईची हवा प्रदुषित करणाऱ्यांविरोधातील कारवाई जोरात

परिसर अस्वच्छ करणाऱ्या ७८५ जणांवर कारवाई, सुमारे १२ लाखांचा दंड वसूल मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वायू

Indigo Flight Cancellations : इंडिगोच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, असे करा प्रवासाचे नियोजन किंवा मिळवा रिफंड

मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा

मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाने नव्या तारखा जाहीर करून

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त