संसदेत गोंधळ घालणारे तृणमुलचा एक आणि काँग्रेसचे १४ खासदार निलंबित

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणा-या दोन्ही सभागृहातील मिळून १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभेतील १४ तर राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे.


संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणा-या या खासदारांना उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. काल झालेल्या घुसखोरीच्या घटनेदरम्यान काँग्रेसच्या पाच खासदारांनी सभापतींच्या आसनाचा मान राखला नसल्याचे कारण दिले आहे. या निलंबित खासदारांमध्ये टी एन प्रथापन, हिबी एडन, डीन कुरियाकोसे, जोथी मणी आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे.


संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असून काल दहाव्या दिवशी दोन तरूणांनी लोकसभेत घुसखोरी केली आणि पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे काल संसदेचे कामकाज काही काळ तहकुब करण्यात आले. तरुणांच्या या कृत्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यावरून आज तृणमुल आणि काँग्रेसच्या खासदारांनी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी सुरक्षेच्या कारणावरून लोकसभेत घोषणा देत गोंधळ घातला.


काँग्रेसच्या खासदारांनी ‘पीएम सदन मे आओ….अमित शाह शरम करो’ अशा प्रकारच्या घोषणा दोन्ही सभागृहात दिल्या गेल्या.


तर राज्यसभेत तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी गदारोळा करत घोषणा दिल्या. दरम्यान, निलंबनानंतर ओब्रायन यांनी संसदेच्या आवारात मूक निषेध आंदोलन केले.



या खासदारांचे झाले निलंबन


लोकसभा - माणिकम टागोर, कनिमोळी, पीआर नटराजन, व्ही के श्रीकांतम, बेनी बहन, के सुब्रमण्यम, एसआर प्रतिभा, एस व्यंकटेश, मोहम्मद जावेद, टीएन प्रतापन, हिबी इडेन, ज्योतीमनी, रम्या हरिदास, डीन क्युरिकोस.


राज्यसभा - राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस खासदार दारेक ओब्रायन.

Comments
Add Comment

ईपीएफओचा मोठा निर्णय, पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची परवानगी

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित

भारत ब्रह्मपुत्रा नदीवर तयार करणार जलसाठा प्रकल्प

चीनच्या ७७ अब्ज डॉलर्सच्या हायड्रो प्रकल्पाला देणार प्रत्युत्तर नवी दिल्ली : ब्रह्मपुत्र नदीवर चीनने सुरू

देशाची 'स्पेसटेक'मध्ये ऐतिहासिक झेप

भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपित नवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने आरोप केले निश्चित नवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा

हे भाजपा सरकार आहे, जे बोलतो ते करतो - अमित शाह

जयपूर : “हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा