भारतात २०२२मध्ये केवळ वीज कोसळल्याने ३५ टक्के मृत्यू

Share

नवी दिल्ली: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नव्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी म्हणजेच २०२२मध्ये नैसर्गिक दुर्घटनांमुळे ८०६० लोकांचा अपघाती मृत्यू झाला. जसे हीटस्ट्रोक, वीज कोसळणे, पुरात वाहून जाणे इत्यादी. मात्र हैराणजनक बाब म्हणजे यातील ३५ टक्के मृत्यू हे वीज कोसळल्याने झाले आहे. हा खुलासा एसीआरबीच्या एक्सिडेंटल डेथ अँड सुसाईड्स इन इंडियामध्ये झाला आहे.

देशात गेल्या वर्षी ९.१ टक्के अपघाती मृत्यू हे हीट स्ट्रोक आणि सनस्ट्रोकमुळे झालेत. म्हणजे भयंकर उकाडा. तर ८.९ टक्के थंडीमुळे गेले. मृ्त्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये ३२.१ टक्के लोक हे ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे आहेत. तर २३.७ टक्के लोक ३० ते ४५ वयादरम्यान आहेत.

वीज कोसळल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात वीज कोसळल्याने ४९६ जण मृ्त्यूमुखी पडले तर बिहारमध्ये ३२९, ओडिशामध्ये ३१६, उत्तर प्रदेशात ३०१ आणि झारखंडमध्ये २६७ लोकांचा जीव गेला. ही पाच राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचा जीव गेला. सर्वाधिक मृत्यू या राज्यांमध्ये झाले आहेत.

जर मेगासिटी म्हणजेच मोठ्या शहरांबाबत बोलायचे झाल्यास मृत्यूमुखी पडलेल्या ८०६० लोकांमध्ये केवळ ६७० लोक मोठ्या शहरातील आहेत. म्हणजेच ८.७ टक्के. गेल्या वर्षात देशातील विविध प्रकारच्या अपघातात ३,९७,५३० लोकांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक लोक मारले गेले ते ३०-४५ वयोगटातील. यांची संख्या १,३२,८४६ इतकी होती.

Tags: lightning

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

52 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

57 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

2 hours ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago