भारतात २०२२मध्ये केवळ वीज कोसळल्याने ३५ टक्के मृत्यू

नवी दिल्ली: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नव्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी म्हणजेच २०२२मध्ये नैसर्गिक दुर्घटनांमुळे ८०६० लोकांचा अपघाती मृत्यू झाला. जसे हीटस्ट्रोक, वीज कोसळणे, पुरात वाहून जाणे इत्यादी. मात्र हैराणजनक बाब म्हणजे यातील ३५ टक्के मृत्यू हे वीज कोसळल्याने झाले आहे. हा खुलासा एसीआरबीच्या एक्सिडेंटल डेथ अँड सुसाईड्स इन इंडियामध्ये झाला आहे.


देशात गेल्या वर्षी ९.१ टक्के अपघाती मृत्यू हे हीट स्ट्रोक आणि सनस्ट्रोकमुळे झालेत. म्हणजे भयंकर उकाडा. तर ८.९ टक्के थंडीमुळे गेले. मृ्त्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये ३२.१ टक्के लोक हे ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे आहेत. तर २३.७ टक्के लोक ३० ते ४५ वयादरम्यान आहेत.


वीज कोसळल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात वीज कोसळल्याने ४९६ जण मृ्त्यूमुखी पडले तर बिहारमध्ये ३२९, ओडिशामध्ये ३१६, उत्तर प्रदेशात ३०१ आणि झारखंडमध्ये २६७ लोकांचा जीव गेला. ही पाच राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचा जीव गेला. सर्वाधिक मृत्यू या राज्यांमध्ये झाले आहेत.


जर मेगासिटी म्हणजेच मोठ्या शहरांबाबत बोलायचे झाल्यास मृत्यूमुखी पडलेल्या ८०६० लोकांमध्ये केवळ ६७० लोक मोठ्या शहरातील आहेत. म्हणजेच ८.७ टक्के. गेल्या वर्षात देशातील विविध प्रकारच्या अपघातात ३,९७,५३० लोकांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक लोक मारले गेले ते ३०-४५ वयोगटातील. यांची संख्या १,३२,८४६ इतकी होती.

Comments
Add Comment

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात