भारतात २०२२मध्ये केवळ वीज कोसळल्याने ३५ टक्के मृत्यू

नवी दिल्ली: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नव्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी म्हणजेच २०२२मध्ये नैसर्गिक दुर्घटनांमुळे ८०६० लोकांचा अपघाती मृत्यू झाला. जसे हीटस्ट्रोक, वीज कोसळणे, पुरात वाहून जाणे इत्यादी. मात्र हैराणजनक बाब म्हणजे यातील ३५ टक्के मृत्यू हे वीज कोसळल्याने झाले आहे. हा खुलासा एसीआरबीच्या एक्सिडेंटल डेथ अँड सुसाईड्स इन इंडियामध्ये झाला आहे.


देशात गेल्या वर्षी ९.१ टक्के अपघाती मृत्यू हे हीट स्ट्रोक आणि सनस्ट्रोकमुळे झालेत. म्हणजे भयंकर उकाडा. तर ८.९ टक्के थंडीमुळे गेले. मृ्त्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये ३२.१ टक्के लोक हे ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे आहेत. तर २३.७ टक्के लोक ३० ते ४५ वयादरम्यान आहेत.


वीज कोसळल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात वीज कोसळल्याने ४९६ जण मृ्त्यूमुखी पडले तर बिहारमध्ये ३२९, ओडिशामध्ये ३१६, उत्तर प्रदेशात ३०१ आणि झारखंडमध्ये २६७ लोकांचा जीव गेला. ही पाच राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचा जीव गेला. सर्वाधिक मृत्यू या राज्यांमध्ये झाले आहेत.


जर मेगासिटी म्हणजेच मोठ्या शहरांबाबत बोलायचे झाल्यास मृत्यूमुखी पडलेल्या ८०६० लोकांमध्ये केवळ ६७० लोक मोठ्या शहरातील आहेत. म्हणजेच ८.७ टक्के. गेल्या वर्षात देशातील विविध प्रकारच्या अपघातात ३,९७,५३० लोकांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक लोक मारले गेले ते ३०-४५ वयोगटातील. यांची संख्या १,३२,८४६ इतकी होती.

Comments
Add Comment

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं