Uttarkashi Tunnel Collapsed : अरेरे! मजुरांच्या बचावकार्यात अडथळेच अडथळे; आता करावा लागणार अवकाळीचा सामना

बचावकार्याचा आज सतरावा दिवस


उत्तराखंड : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशी येथील सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Silkyara Tunnel) अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एक नव्हे तर दोन वेगवेगळ्या मार्गांनी या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आज सतराव्या दिवशीदेखील रेस्क्यू ऑपरेशनला (Rescue operation) यश न आल्याने चिंता वाढली आहे. त्यातच आणखी एक त्रासदायक बाब म्हणजे अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) बचावकार्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


बचाव करताना एकामागून एक समस्या येत असल्याचे वास्तव आहे. पूर्वी ड्रिलिंगसाठी आणलेले अमेरिकन मशीन बिघडले आणि आता खराब हवामान नवीन संकटाचे संकेत देत आहे. उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे बचावादरम्यान नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. येत्या २४ तासांत राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचण येऊ शकते, अशी शक्यताही शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.


सध्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी मॅन्युअल आणि व्हर्टिकल ड्रिलिंग अशा दोन मार्गांचा वापर केला जात आहे. ऑगर मशिनने अडथळे निर्माण झाल्यानंतर काल रात्रीपासून मॅन्युअल ड्रिलिंग करण्यात येत आहे. याद्वारे सुमारे ४ ते ५ मीटर खोदले. आता फक्त ५ ते ६ मीटर खोदाईचे काम बाकी आहे. त्याचप्रमाणे बोगद्याच्या वरून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू आहे. वरून कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी ८६ मीटर खोदणे आवश्यक आहे. त्यापैकी सुमारे ३६ मीटर खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान, आज रात्री उशिरापर्यंत मजुरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


दिलासादायक बाब म्हणजे मजुरांच्या नातेवाईकांना मजुरांसाठी कपडे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर बोगद्याच्या बाहेर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बचावानंतर मजुरांना रुग्णालयात नेण्यात येईल. रुग्णवाहिका बोगद्याच्या बाहेर जिथे पोहोचतील तिथे रस्त्याची डागडुजी केली जात आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव