Uttarkashi Tunnel Collapsed : अरेरे! मजुरांच्या बचावकार्यात अडथळेच अडथळे; आता करावा लागणार अवकाळीचा सामना

बचावकार्याचा आज सतरावा दिवस


उत्तराखंड : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशी येथील सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Silkyara Tunnel) अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एक नव्हे तर दोन वेगवेगळ्या मार्गांनी या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आज सतराव्या दिवशीदेखील रेस्क्यू ऑपरेशनला (Rescue operation) यश न आल्याने चिंता वाढली आहे. त्यातच आणखी एक त्रासदायक बाब म्हणजे अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) बचावकार्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


बचाव करताना एकामागून एक समस्या येत असल्याचे वास्तव आहे. पूर्वी ड्रिलिंगसाठी आणलेले अमेरिकन मशीन बिघडले आणि आता खराब हवामान नवीन संकटाचे संकेत देत आहे. उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे बचावादरम्यान नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. येत्या २४ तासांत राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचण येऊ शकते, अशी शक्यताही शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.


सध्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी मॅन्युअल आणि व्हर्टिकल ड्रिलिंग अशा दोन मार्गांचा वापर केला जात आहे. ऑगर मशिनने अडथळे निर्माण झाल्यानंतर काल रात्रीपासून मॅन्युअल ड्रिलिंग करण्यात येत आहे. याद्वारे सुमारे ४ ते ५ मीटर खोदले. आता फक्त ५ ते ६ मीटर खोदाईचे काम बाकी आहे. त्याचप्रमाणे बोगद्याच्या वरून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू आहे. वरून कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी ८६ मीटर खोदणे आवश्यक आहे. त्यापैकी सुमारे ३६ मीटर खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान, आज रात्री उशिरापर्यंत मजुरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


दिलासादायक बाब म्हणजे मजुरांच्या नातेवाईकांना मजुरांसाठी कपडे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर बोगद्याच्या बाहेर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बचावानंतर मजुरांना रुग्णालयात नेण्यात येईल. रुग्णवाहिका बोगद्याच्या बाहेर जिथे पोहोचतील तिथे रस्त्याची डागडुजी केली जात आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही