Uttarkashi Tunnel Collapse : पंधरवड्यानंतर देखील बोगद्यातील ४१ मजुरांची सुटका आणखी लांबणीवर

आडव्या मार्गात अडथळे आल्याने आता करणार उभे खोदकाम


उत्तराखंड : उत्तराखंडातील (Uttarakhand) उत्तरकाशीत निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Tunnel Collapse) ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ४१ मजूर अडकले. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर चालू असलेले प्रयत्न कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. १२ नोव्हेंबर रोजी अडकलेले या मजुरांची आज पंधराव्या दिवशीदेखील सुटका झालेली नाही. उलट ती अधिक लांबणीवर जाणार असल्याचे समजत आहे. ऑगर मशीनचा वापर अयशस्वी ठरल्यानंतर आता व्हर्टिकल ड्रीलिंग (Vertical Drilling) करुन मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


मजुरांच्या सुटकेसाठी व्हर्टिकल खोदकाम सुरू असून त्यासाठी कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) नागपूरची चमू सिल्क्यरा येथे दाखल झाली आहे. व्हर्टिकल ड्रीलिंगनंतर मजुरांना वरून बाहेर काढण्याच्या कॅप्सूलचे काम केले जाणार आहे. यात चार तंत्रज्ञांचा समावेश आहे. गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या रेस्क्यू चमूला त्यामुळे थांबून थांबून अंदाज घेत काम करावे लागत आहे.


अवकाळी पावसामुळे देखील या बचावकार्यात अडथळे येत आहेत. देशातील अन्य भागांतून पाठविलेली यंत्रसामग्री रस्ते मार्गाने सिल्क्यरा येथे पोहचण्यास पावसामुळे प्रचंड विलंब होत आहे. आडव्या मार्गाने पाइप टाकण्यात अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून उभ्या मार्गाने डोंगरावरून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना बाहेर येण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे म्हटले जात आहे. दरम्यान, मजुरांची प्रकृती ठीक असून त्यांना वेळोवेळी जेवण इतर वस्तू पुरविल्या जात आहेत.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव