Uttarkashi Tunnel Collapse : पंधरवड्यानंतर देखील बोगद्यातील ४१ मजुरांची सुटका आणखी लांबणीवर

आडव्या मार्गात अडथळे आल्याने आता करणार उभे खोदकाम


उत्तराखंड : उत्तराखंडातील (Uttarakhand) उत्तरकाशीत निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Tunnel Collapse) ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ४१ मजूर अडकले. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर चालू असलेले प्रयत्न कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. १२ नोव्हेंबर रोजी अडकलेले या मजुरांची आज पंधराव्या दिवशीदेखील सुटका झालेली नाही. उलट ती अधिक लांबणीवर जाणार असल्याचे समजत आहे. ऑगर मशीनचा वापर अयशस्वी ठरल्यानंतर आता व्हर्टिकल ड्रीलिंग (Vertical Drilling) करुन मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


मजुरांच्या सुटकेसाठी व्हर्टिकल खोदकाम सुरू असून त्यासाठी कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) नागपूरची चमू सिल्क्यरा येथे दाखल झाली आहे. व्हर्टिकल ड्रीलिंगनंतर मजुरांना वरून बाहेर काढण्याच्या कॅप्सूलचे काम केले जाणार आहे. यात चार तंत्रज्ञांचा समावेश आहे. गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या रेस्क्यू चमूला त्यामुळे थांबून थांबून अंदाज घेत काम करावे लागत आहे.


अवकाळी पावसामुळे देखील या बचावकार्यात अडथळे येत आहेत. देशातील अन्य भागांतून पाठविलेली यंत्रसामग्री रस्ते मार्गाने सिल्क्यरा येथे पोहचण्यास पावसामुळे प्रचंड विलंब होत आहे. आडव्या मार्गाने पाइप टाकण्यात अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून उभ्या मार्गाने डोंगरावरून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना बाहेर येण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे म्हटले जात आहे. दरम्यान, मजुरांची प्रकृती ठीक असून त्यांना वेळोवेळी जेवण इतर वस्तू पुरविल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत