Uttarkashi Tunnel Collapse : पंधरवड्यानंतर देखील बोगद्यातील ४१ मजुरांची सुटका आणखी लांबणीवर

आडव्या मार्गात अडथळे आल्याने आता करणार उभे खोदकाम


उत्तराखंड : उत्तराखंडातील (Uttarakhand) उत्तरकाशीत निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Tunnel Collapse) ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ४१ मजूर अडकले. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर चालू असलेले प्रयत्न कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. १२ नोव्हेंबर रोजी अडकलेले या मजुरांची आज पंधराव्या दिवशीदेखील सुटका झालेली नाही. उलट ती अधिक लांबणीवर जाणार असल्याचे समजत आहे. ऑगर मशीनचा वापर अयशस्वी ठरल्यानंतर आता व्हर्टिकल ड्रीलिंग (Vertical Drilling) करुन मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


मजुरांच्या सुटकेसाठी व्हर्टिकल खोदकाम सुरू असून त्यासाठी कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) नागपूरची चमू सिल्क्यरा येथे दाखल झाली आहे. व्हर्टिकल ड्रीलिंगनंतर मजुरांना वरून बाहेर काढण्याच्या कॅप्सूलचे काम केले जाणार आहे. यात चार तंत्रज्ञांचा समावेश आहे. गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या रेस्क्यू चमूला त्यामुळे थांबून थांबून अंदाज घेत काम करावे लागत आहे.


अवकाळी पावसामुळे देखील या बचावकार्यात अडथळे येत आहेत. देशातील अन्य भागांतून पाठविलेली यंत्रसामग्री रस्ते मार्गाने सिल्क्यरा येथे पोहचण्यास पावसामुळे प्रचंड विलंब होत आहे. आडव्या मार्गाने पाइप टाकण्यात अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून उभ्या मार्गाने डोंगरावरून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना बाहेर येण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे म्हटले जात आहे. दरम्यान, मजुरांची प्रकृती ठीक असून त्यांना वेळोवेळी जेवण इतर वस्तू पुरविल्या जात आहेत.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या