Bus Accident: धावत्या बसचे निखळले चाक, भर रस्त्यात बस झाली पलटी...

सोलापूरहल डेपोमधून एसटी बस रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नांदेडकडे रवाना झाली होती. बसमधून जवळपास १५ ते २० प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर शहरा जवळ असलेल्या उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटला आणि चाक निखळला. जॉईंट तुटल्याने धावती बस महामार्गावर हेलकावे खात पलटी झाली आणि अपघात झाला.


धावत्या एसटी बसमधील अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.


 सोलापूर डेपोमधून नांदेडकडे रवाना झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत अपघात झाला आहे. धावत्या एसटी बसचा चाक निखळल्याने एसटी प्रशासनाच्या तांत्रिक विभागावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अपघाताची भीषणता मोठी होती, धावती बस महामार्गावर चाक निखळून पलटी झाली. सुदैवाने यामध्ये मोठी जीवितहानी झाली नाही. एसटी खात्याचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील उळे कासेगाव या अपघाताठिकाणी दाखल झाले आहेत.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी