Bus Accident: धावत्या बसचे निखळले चाक, भर रस्त्यात बस झाली पलटी...

सोलापूरहल डेपोमधून एसटी बस रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नांदेडकडे रवाना झाली होती. बसमधून जवळपास १५ ते २० प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर शहरा जवळ असलेल्या उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटला आणि चाक निखळला. जॉईंट तुटल्याने धावती बस महामार्गावर हेलकावे खात पलटी झाली आणि अपघात झाला.


धावत्या एसटी बसमधील अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.


 सोलापूर डेपोमधून नांदेडकडे रवाना झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत अपघात झाला आहे. धावत्या एसटी बसचा चाक निखळल्याने एसटी प्रशासनाच्या तांत्रिक विभागावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अपघाताची भीषणता मोठी होती, धावती बस महामार्गावर चाक निखळून पलटी झाली. सुदैवाने यामध्ये मोठी जीवितहानी झाली नाही. एसटी खात्याचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील उळे कासेगाव या अपघाताठिकाणी दाखल झाले आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे