Uttarkashi tunnel collapsed : बचाव यंत्रणा करतायत काय? ते ४१ मजूर अजूनही बोगद्यातच!

उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) उत्तरकाशीतील निर्माणाधीन सिल्क्यरा बोगदा कोसळल्याने (Uttarkashi tunnel collapsed) दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १२ नोव्हेंबरपासून ४१ मजूर आत अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वच यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगण्यात आले असले तरी आज तेराव्या दिवशीही या मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही. हे मजूर कालच्या दिवशीच बाहेर निघतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अजूनही त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरुच आहेत.


सुरुवातीला ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्याने बोगदा खोदण्यासाठी खास अमेरिकन तंत्रज्ञानाने बनवलेली ऑगर मशीन मागवण्यात आली होती. मात्र, बचावकार्यादरम्यान काल या मशीनमध्येही बिघाड झाला. तिच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे गेले १६ तास खोदकाम थांबले आहे. देशविदेशांमधून तज्ज्ञही या बचावकार्यासाठी बोलावण्यात आले मात्र त्याने काही फरक पडला नसल्याचे चित्र आहे. कामगार आतमध्ये सुखरुप श्वास घेत असले तरी त्यांना कराव्या लागत असलेल्या अडीअडचणींचा सामना लक्षात घेऊन लवकरात लवकर त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे.


दरम्यान, आता बचावकार्यावेळी बोगद्याच्या आतमध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, जेणेकरून बोगद्याच्या आतमध्ये बचाव कार्यादरम्यान कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याचा आधीच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी सतत चर्चा करण्यात येत असून त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत. बचावकार्य अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी कामगारांमची यातून केव्हा सुटका होईल, हा मोठा प्रश्न आहे.

Comments
Add Comment

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड