Uttarkashi tunnel collapsed : अरेरे! उत्तरकाशीतील त्या मजुरांच्या बचावकार्यास होणार विलंब; ऑगर मशीनमध्ये बिघाड

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi tunnel collapsed) दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १२ नोव्हेंबरपासून अडकलेले ४१ मजूर अजूनही अडकूनच आहेत. आज बाराव्या दिवशीही त्यांची सुटका झालेली नाही. त्यांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आज कामगार बाहेर येतीलच असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र, बोगदा खोदणाऱ्या अमेरिकन ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बचावकार्यास काहीसा विलंब होणार आहे.


कामगारांना उपचारांसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली असून डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. बोगद्यात ५१ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. आता कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ १२ मीटरचे अंतर उरले आहे. अशा परिस्थितीत कामगार लवकरच त्यातून बाहेर पडतील, अशी आशा आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान आज चांगली बातमी येऊ शकते. मात्र, त्यास नियोजित वेळेपेक्षा थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, तोडगा काढण्यासाठी दिल्लीहून हेलिकॉप्टरद्वारे ७ तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं असून तांत्रिक बिघाड दूर करुन कोणत्याही परिस्थितीत आजच बचावकार्य पूर्ण केलं जाईल, असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. काही वेळात तज्ज्ञांची टीम येईल. केंद्रीय मंत्री व्ही के सिंह उत्तरकाशीला येणार आहेत. मंत्री दिल्लीहून तंत्रज्ञ टीमसह येथे पोहोचतील. सध्या काही काळ बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधलेल्या मंदिरात प्रार्थना केली जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी मुख्यमंत्री पुष्कर धामी (CM Pushkar Dhami) यांना फोन करून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अन्न, औषधी व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याबाबत माहिती घेतली.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच