Uttarkashi tunnel collapsed : अरेरे! उत्तरकाशीतील त्या मजुरांच्या बचावकार्यास होणार विलंब; ऑगर मशीनमध्ये बिघाड

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi tunnel collapsed) दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १२ नोव्हेंबरपासून अडकलेले ४१ मजूर अजूनही अडकूनच आहेत. आज बाराव्या दिवशीही त्यांची सुटका झालेली नाही. त्यांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आज कामगार बाहेर येतीलच असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र, बोगदा खोदणाऱ्या अमेरिकन ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बचावकार्यास काहीसा विलंब होणार आहे.


कामगारांना उपचारांसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली असून डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. बोगद्यात ५१ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. आता कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ १२ मीटरचे अंतर उरले आहे. अशा परिस्थितीत कामगार लवकरच त्यातून बाहेर पडतील, अशी आशा आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान आज चांगली बातमी येऊ शकते. मात्र, त्यास नियोजित वेळेपेक्षा थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, तोडगा काढण्यासाठी दिल्लीहून हेलिकॉप्टरद्वारे ७ तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं असून तांत्रिक बिघाड दूर करुन कोणत्याही परिस्थितीत आजच बचावकार्य पूर्ण केलं जाईल, असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. काही वेळात तज्ज्ञांची टीम येईल. केंद्रीय मंत्री व्ही के सिंह उत्तरकाशीला येणार आहेत. मंत्री दिल्लीहून तंत्रज्ञ टीमसह येथे पोहोचतील. सध्या काही काळ बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधलेल्या मंदिरात प्रार्थना केली जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी मुख्यमंत्री पुष्कर धामी (CM Pushkar Dhami) यांना फोन करून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अन्न, औषधी व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याबाबत माहिती घेतली.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव