Health: थंडीत नाही पडणार आजारी, तुमच्या डाएटमध्ये सामील करा हे पदार्थ

मुंबई: थंडीचा(winter) मोसम सुरू झाला की फ्लू, सर्दीसारखे इन्फेक्शन वाढू लागतात. याचे कारण ऋतू बदलण्यासोबतच आपली रोगप्रतिकारक क्षमता(immunity) कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता म्हणजेच व्हायरसविरोधात लढण्याची क्षमता. यासाठीच रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणे गरजेचे असते. जर एखाद्याची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असेल तर त्याला योग्य प्रकारचे डाएट घेणे गरजेचे असते.


इम्युनिटी वाढवण्यासाठी डाएटमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असेल तर खालील दिलेल्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करा.



आले आणि लसूण


आले आणि लसणीमुळे केवळ पदार्थाचा स्वादच वाढत नाही. तर यामुळे सुपर अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणांमुळे आरोग्य सुधारते.



काळी मिरी


काळी मिरी हा सगळ्यात चांगला मसाल आहे. याला काळे सोनेही म्हटले जाते यामुळे केवळ जेवण स्वादिष्टच बनत नाही तर शरीरात उष्णता वाढवण्याचे काम करते. काळी मिरीमुळे इम्युनिटी सुधारण्यास मदत होते.



आंबट फळे


प्रत्येक फळामध्ये व्हिटामिन सी, फायबर, अँटी ऑक्सिडंट, मिनरल्स आणि एन्झाईम भरपूर असतात जे आजाराविरोधात लढण्यास मदत करतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. तसेच पचनही व्यवस्थित होते. आंबट फळांच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.



मांस आणि मच्छी


मांस आणि मच्छीमध्ये प्रोटीन, व्हिटामिन बी, झिंक आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरात आरबीसी आणि डब्लूबीसी काऊंट वाढतो. यामुळे शरीरास सुरक्षा मिळते तसेच इम्युनिटीही वाढते.

Comments
Add Comment

Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन

राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे

निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक संभ्रमात

परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी; शिक्षकांच्या अडचणीत वाढ मुंबई : महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५

भाजपच्या नगरसेवकांची सोमवारी कोकण भवनमध्ये नोंदणी

गटाऐवजी भाजप स्वतंत्रपणे नगरसेवकांची करणार नोंदणी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर

राज्यातील ‘आयटीआय’ होणार ‘स्किल डेव्हलमपेंट हब’

मंत्री मंगलप्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान