Health: थंडीत नाही पडणार आजारी, तुमच्या डाएटमध्ये सामील करा हे पदार्थ

  198

मुंबई: थंडीचा(winter) मोसम सुरू झाला की फ्लू, सर्दीसारखे इन्फेक्शन वाढू लागतात. याचे कारण ऋतू बदलण्यासोबतच आपली रोगप्रतिकारक क्षमता(immunity) कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता म्हणजेच व्हायरसविरोधात लढण्याची क्षमता. यासाठीच रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणे गरजेचे असते. जर एखाद्याची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असेल तर त्याला योग्य प्रकारचे डाएट घेणे गरजेचे असते.


इम्युनिटी वाढवण्यासाठी डाएटमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असेल तर खालील दिलेल्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करा.



आले आणि लसूण


आले आणि लसणीमुळे केवळ पदार्थाचा स्वादच वाढत नाही. तर यामुळे सुपर अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणांमुळे आरोग्य सुधारते.



काळी मिरी


काळी मिरी हा सगळ्यात चांगला मसाल आहे. याला काळे सोनेही म्हटले जाते यामुळे केवळ जेवण स्वादिष्टच बनत नाही तर शरीरात उष्णता वाढवण्याचे काम करते. काळी मिरीमुळे इम्युनिटी सुधारण्यास मदत होते.



आंबट फळे


प्रत्येक फळामध्ये व्हिटामिन सी, फायबर, अँटी ऑक्सिडंट, मिनरल्स आणि एन्झाईम भरपूर असतात जे आजाराविरोधात लढण्यास मदत करतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. तसेच पचनही व्यवस्थित होते. आंबट फळांच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.



मांस आणि मच्छी


मांस आणि मच्छीमध्ये प्रोटीन, व्हिटामिन बी, झिंक आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरात आरबीसी आणि डब्लूबीसी काऊंट वाढतो. यामुळे शरीरास सुरक्षा मिळते तसेच इम्युनिटीही वाढते.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.