Borivali National Park Toy Train : वनराणी इज बॅक! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा धावणार!

मुंबई : बोरिवलीच्या निसर्गरम्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून, उद्यानाचा कोपरा न कोपरा आता पुन्हा या ट्रेनच्या आवाजाने दुमदुमणार आहे. गेल्या ४ वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे आणि चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे बंद असलेली ही सेवा आता नव्या रुपात भाविकांच्या आणि पर्यटकांच्या भेटीला येत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज दुपारी १२ वाजता या ट्रेनला हिरवा कंदिल दाखवण्यात येईल.



नव्या 'वनराणी'ची खास वैशिष्ट्ये



यावेळी उद्यानात एक नाही तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या टॉय ट्रेन्स पर्यटकांचे मनोरंजन करणार आहेत. अहमदाबादहून दाखल झालेली ही ट्रेन आधुनिकतेचा नमुना आहे. याचे छप्पर पारदर्शक असून खिडक्या मोठ्या आहेत, ज्यामुळे पर्यटकांना ट्रेनमध्ये बसूनही जंगलाच्या सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेता येईल. ही ट्रेन पूर्णपणे मोकळी (Open) असल्यामुळे निसर्गाच्या अगदी जवळ असल्याचा अनुभव पर्यटकांसाठी रोमांचकारी ठरेल. विशेषतः मुलांना ही ट्रेन भुरळ घालणारी ठरणार आहे.



बंद पडलेली सेवा आणि पुनरुज्जीवन


२०२१ मध्ये आलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळामुळे उद्यानातील रेल्वे मार्गाचे आणि इंजिनचे मोठे नुकसान झाले होते, परिणामी ही सेवा थांबवण्यात आली होती. मात्र, उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी या प्रकल्पात वैयक्तिक रस घेऊन पाठपुरावा केल्यामुळे या ऐतिहासिक टॉय ट्रेनचे पुनरुज्जीवन होऊ शकले आहे. या नवीन रेल्वे प्रणालीची सर्व चाचणी पूर्ण झाली असून, ती आता प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सज्ज आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र