मुंबईकरांसाठी मोठी संधी! म्हाडाची २५०० घरांची लॉटरी, तारीख झाली जाहीर

मुंबई : मुंबईत स्वतःचे घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र वाढत्या मालमत्ता दरांमुळे सर्वसामान्यांना घर घेणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून सुमारे २५०० घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू असून ही सोडत एप्रिल २०२६ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या लॉटरीसंदर्भातील अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर इच्छुक नागरिकांना अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. अर्ज प्रक्रियेनंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस संगणकीय पद्धतीने घरांची सोडत काढली जाणार आहे.


या लॉटरीमध्ये मागाठाणे, विक्रोळी आणि प्रतीक्षा नगर यांसारख्या भागांतील घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या शोधात असलेल्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मुंबईत खासगी बांधकाम व्यावसायिकांकडील घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी घर खरेदी करणे अवघड ठरत आहे. अशा परिस्थितीत म्हाडाकडून उपलब्ध होणारी घरे तुलनेने परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने या लॉटरीकडे मुंबईकरांचे विशेष लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य