मुंबईकरांसाठी मोठी संधी! म्हाडाची २५०० घरांची लॉटरी, तारीख झाली जाहीर

मुंबई : मुंबईत स्वतःचे घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र वाढत्या मालमत्ता दरांमुळे सर्वसामान्यांना घर घेणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून सुमारे २५०० घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू असून ही सोडत एप्रिल २०२६ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या लॉटरीसंदर्भातील अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर इच्छुक नागरिकांना अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. अर्ज प्रक्रियेनंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस संगणकीय पद्धतीने घरांची सोडत काढली जाणार आहे.


या लॉटरीमध्ये मागाठाणे, विक्रोळी आणि प्रतीक्षा नगर यांसारख्या भागांतील घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या शोधात असलेल्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मुंबईत खासगी बांधकाम व्यावसायिकांकडील घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी घर खरेदी करणे अवघड ठरत आहे. अशा परिस्थितीत म्हाडाकडून उपलब्ध होणारी घरे तुलनेने परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने या लॉटरीकडे मुंबईकरांचे विशेष लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र