Uttarkashi Tunnel: उत्तराखंड बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेबाबत ही आहे गुड न्यूज

नवी दिल्ली: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये १२ नोव्हेंबरपासून सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याच्या दिशेने मोठे यश हाती आले आहे. सर्व मजुरांचे पहिले फोटो समोर आले आहेत.


रेस्क्यू टीमच्या कॅमेऱ्यामध्ये या मजुरांचा फोटो आला आहे त्यातून ते कशा परिस्थितीत आहेत हे समोर आले आहे. सिलक्यारा बोगद्यात अडकलेले मजूर पूर्णपणे सुरक्षित आहेत. आज बचाव कार्याचा १०वा दिवस आहे आणि आजपासून वर्टिकल ड्रिलिंगही सुरू केले जाईल.





गेल्या १० दिवसांपासून बचाव कार्यात गुंतलेल्या रेस्क्यू टीमचा कॅमेरा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांपर्यंत पोहोचला. यामुळे मजुरांचे फोटो समोर येऊ शकले. दिलासादायक बाब म्हणजे सर्व मजुर सुरक्षित आहेत. तसेच त्यांच्यापर्यंत गरजेचे सामान पोहोचवले जात आहे. वॉकी टॉकीच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलण्यातही आले. इतकंच नव्हे तर पाईपच्या माध्यमातून मजुरांना मोबाईल फोन तसेच चार्जरही पाठवण्यात आला.


बचावपथकाला सोमवारी सिलक्यारा बोगद्याच्या विरुद्ध दिशेले ड्रिंलिंग करत मलब्याच्या आर पार ५३ मीटर लांब सहा इंच व्यासाची पाईपलाईन टाकण्यात यश मिळआले. यामुळे गेल्या आठ दिवसांत बोगद्यात अडकलेल्या कामगारांना खाद्यवस्तू, संचार उपकरण तसेच गरजेच्या वस्तू पोहोचवण्यात आल्या.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच