मुलीने फोनवरून दिली love marriageची माहिती, वडिलांनी उचलले हे भयानक पाऊल

वडोदरा: गुजरातच्या वडोदरामध्ये एका मुलीने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जात प्रेमविवाह केला. यामुळे चिडलेल्या वडिलांनी समाजाला गोळा करून शोकसभा घातली. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या केसाचे मुंडनही केले. ही घटना लिलोरा गावात घडली. या संपूर्ण गावात याच गोष्टीची चर्चा आहे. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याने मुलीचे आई-वडिल तिच्यावर चिडले आहेत. या मुलीचे बऱ्याच काळापासून एका युवकासोबत प्रेमसंबंध होते.


वाघोडिया तहसीलमधील एका छोट्याशा लिलोरा गावातील निवासी हसमुखभाई वादलंच यांची मोठी मुलगी अर्पिता बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. १२ ऑक्टोबरला अर्पिताने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जात ऋत्विक भालिया नावाच्या तरूणाशी लग्न केले. त्यानंतर अर्पिताने ही माहिती २२ ऑक्टोबरला आपल्या वडिलांना मेसेजद्वारे दिली.



वडिलांनी उचलले हे पाऊल


मुलीने आपल्या मर्जीविरोधा लग्न केल्याने आई-वडिलांना मोठा धक्काच बसला. वडिलांनी तर भयानक पाऊल उचलले. त्यांनी आपल्या मुलीला मृत घोषित करत तिच्या नावाने शोकसभा बोलावली. त्यांनी आपल्या मुलीच्या नावासमोर स्वर्गीय असे लिहित बॅनर छापले तसेच आपल्या केसांचे मुंडनही केले. समाजाला हे ही सांगितले की आता त्यांचा आपल्या मुलीशी कोणताही संबंध नाही. त्यांची मुलगी त्यांच्यासाठी कायमची मेली आहे.


गुजरात सरकारने कायदा बनवला आहे की आई-वडिलांच्या मर्जीविरोधात कोणीही प्रेमविवाह करू शकत नाही. मात्र आतापर्यंत हा कायदा लागू करण्यात आलेला नाही. हसमुखभाई वालंद मागणी करत आहेत की हा कायदा लवकरात लवकर लागू केला जावा यामुळे कोणतीही मुलही असे पाऊल उचलणार नाही.


Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११