मुलीने फोनवरून दिली love marriageची माहिती, वडिलांनी उचलले हे भयानक पाऊल

वडोदरा: गुजरातच्या वडोदरामध्ये एका मुलीने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जात प्रेमविवाह केला. यामुळे चिडलेल्या वडिलांनी समाजाला गोळा करून शोकसभा घातली. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या केसाचे मुंडनही केले. ही घटना लिलोरा गावात घडली. या संपूर्ण गावात याच गोष्टीची चर्चा आहे. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याने मुलीचे आई-वडिल तिच्यावर चिडले आहेत. या मुलीचे बऱ्याच काळापासून एका युवकासोबत प्रेमसंबंध होते.


वाघोडिया तहसीलमधील एका छोट्याशा लिलोरा गावातील निवासी हसमुखभाई वादलंच यांची मोठी मुलगी अर्पिता बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. १२ ऑक्टोबरला अर्पिताने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जात ऋत्विक भालिया नावाच्या तरूणाशी लग्न केले. त्यानंतर अर्पिताने ही माहिती २२ ऑक्टोबरला आपल्या वडिलांना मेसेजद्वारे दिली.



वडिलांनी उचलले हे पाऊल


मुलीने आपल्या मर्जीविरोधा लग्न केल्याने आई-वडिलांना मोठा धक्काच बसला. वडिलांनी तर भयानक पाऊल उचलले. त्यांनी आपल्या मुलीला मृत घोषित करत तिच्या नावाने शोकसभा बोलावली. त्यांनी आपल्या मुलीच्या नावासमोर स्वर्गीय असे लिहित बॅनर छापले तसेच आपल्या केसांचे मुंडनही केले. समाजाला हे ही सांगितले की आता त्यांचा आपल्या मुलीशी कोणताही संबंध नाही. त्यांची मुलगी त्यांच्यासाठी कायमची मेली आहे.


गुजरात सरकारने कायदा बनवला आहे की आई-वडिलांच्या मर्जीविरोधात कोणीही प्रेमविवाह करू शकत नाही. मात्र आतापर्यंत हा कायदा लागू करण्यात आलेला नाही. हसमुखभाई वालंद मागणी करत आहेत की हा कायदा लवकरात लवकर लागू केला जावा यामुळे कोणतीही मुलही असे पाऊल उचलणार नाही.


Comments
Add Comment

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा