डहाणूत ग्रामपंचायत निवडणूकीत संमिश्र प्रतिसाद

चिंचणी ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व


डहाणू : डहाणू तालुक्यात १७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी थेट सरपंचपदासाठी आणि १९७ सदस्यपदासाठी सोमवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत गटागटात विखुरल्या गेलेल्या राजकीय पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, सर्वांत मोठ्या असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीवर भाजपने पहिल्यांदाच आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला एकही जागा मिळविता आलेली नाही, तर भाजपने मिळविल्या यशाचे श्रेय जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत यांना देण्यात येत असून, त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


सोमवारी झालेल्या १७ ग्रामपंचायत मतमोजणीप्रमाणे विविध राजकीय पक्षांनी दावा केल्याप्रमाणे पक्षीय बलाबल असे आहे, भाजप ४, माकप ४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३, मनसे १, उबाठा ४, अपक्ष व गाव पॅनल १.


थेट सरपंचपदी निवडून आलेले उमेदवार राजकीय पक्षाने दावा केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीनुसार


सावटा - महाद्या बेंदर (भाजप), चिंचणी - मेघा शिंगडे (भाजप), दाभोण - हर्षला दळवी (भाजप), जांबुगाव - प्रेमा करबट (भाजप);


किन्हवली - शेलु दुमाडा (माकप), दाभाडी - पार्वती पिलेना (माकप), मोडगाव - रंजना चौधरी (माकप), सोगवे - लहानी दौडा (माकप);


आंबेसरी - गीता मोरघा (उबाठा), चारोटी - तेजस्वी कडू (उबाठा), गोवणे - अलका घोडा (उबाठा), वंकास - रुबीना तांडेल (उबाठा),


दापचारी - भारती भीमराव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), गांगणगाव - सविता पालकर (राकाँप शरद पवार गट),


राई - नवशा धोडी (मनसे),


बोर्डी - श्याम दुबळा(परिवर्तन पॅनल),


कापसी - कलावती रावते (अपक्ष) असे सरपंचपदी विराजमान झाले आहेत.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस