डहाणूत ग्रामपंचायत निवडणूकीत संमिश्र प्रतिसाद

चिंचणी ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व


डहाणू : डहाणू तालुक्यात १७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी थेट सरपंचपदासाठी आणि १९७ सदस्यपदासाठी सोमवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत गटागटात विखुरल्या गेलेल्या राजकीय पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, सर्वांत मोठ्या असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीवर भाजपने पहिल्यांदाच आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला एकही जागा मिळविता आलेली नाही, तर भाजपने मिळविल्या यशाचे श्रेय जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत यांना देण्यात येत असून, त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


सोमवारी झालेल्या १७ ग्रामपंचायत मतमोजणीप्रमाणे विविध राजकीय पक्षांनी दावा केल्याप्रमाणे पक्षीय बलाबल असे आहे, भाजप ४, माकप ४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३, मनसे १, उबाठा ४, अपक्ष व गाव पॅनल १.


थेट सरपंचपदी निवडून आलेले उमेदवार राजकीय पक्षाने दावा केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीनुसार


सावटा - महाद्या बेंदर (भाजप), चिंचणी - मेघा शिंगडे (भाजप), दाभोण - हर्षला दळवी (भाजप), जांबुगाव - प्रेमा करबट (भाजप);


किन्हवली - शेलु दुमाडा (माकप), दाभाडी - पार्वती पिलेना (माकप), मोडगाव - रंजना चौधरी (माकप), सोगवे - लहानी दौडा (माकप);


आंबेसरी - गीता मोरघा (उबाठा), चारोटी - तेजस्वी कडू (उबाठा), गोवणे - अलका घोडा (उबाठा), वंकास - रुबीना तांडेल (उबाठा),


दापचारी - भारती भीमराव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), गांगणगाव - सविता पालकर (राकाँप शरद पवार गट),


राई - नवशा धोडी (मनसे),


बोर्डी - श्याम दुबळा(परिवर्तन पॅनल),


कापसी - कलावती रावते (अपक्ष) असे सरपंचपदी विराजमान झाले आहेत.

Comments
Add Comment

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख