Grampanchayat Elections : ग्रामपंचायतीच्या निवडणुकींमध्ये महायुतीचाच धुरळा

ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का


मुंबई : राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांची वाट पाहावी लागत असली तरी ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल रविवारी पार पडल्या. राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी होत आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. यातील काही निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत सामील असणार्‍या पक्षांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.


आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार,
भाजप - ८१ जागा
अजित पवार गट - ७७ जागा
शिवसेना - ६५ जागा
काँग्रेस - ३६ जागा
ठाकरे गट - ३० जागा
शरद पवार गट - ३१ जागा
इतर - ४२ जागा
त्यामुळे भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात जरी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असली, तरी ग्रामपंचायत किंवा सथानिक पातळीवर प्रत्येक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतो. त्यामुळे सध्या भाजपचेच वर्चसव असल्याचे समजत आहे. महायुतीने आतापर्यंत २२३, मविआने ९७ तर इतर गटांनी ४२ जागांवर वर्चस्व मिळवले आहे.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी