Accident: पुलावरून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली प्रवासी बस, ४ जणांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानच्या दौसा येथे एका प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर या अपघातात २४ जण जखमी झाले आहे. या अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात डीएमसह सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हा अपघात नॅशनल हायवे २१वर झाला. येथे एक प्रवासी बस पुलाचे रेलिंग सोडून खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळली. यामुळे रेल्वेच्या प्रवासालाही ब्रेक लागला.


दौसाचे डीएम कमर चौधरी यांच्या माहितीनुसार रविवारी रात्री सवा दोन वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे २१वर हा भीषण रस्ते अपघात ाला. येथे हरिद्वार येथून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलाचे रेलिंग तोडून ही बस खाली कोसळली. ही बस थेट जयपूर दिल्ली रेल्वे मार्गाच्या ट्रॅकवर कोसळली. बस पुलावर खाली कोसळून रेल्वे ट्रॅकवर पडल्याची बातमी ऐकून तातडीने तेथे पोलीस तसेच अॅम्ब्युलन्सची गाडी रवाना झाली.


अपघातानंतर काही वेळात जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघाताची माहिती जशी रेल्वे कंट्रोल रूमला मिळाली तसे तत्काळ जयपूर-दिल्ली रेल्वेमार्गावरील अप आणि डाऊन रेल्वे मार्ग बंद करण्यात आले.



पुलावरून खाली कोसळून पलटली बस


मिळालेल्या माहितीनुसार हरिद्वार येथून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या या प्रवासी बसचे रात्री सव्वा दोनच्या सुमारास नियंत्रण सुटले. वेगात धावणारी ही बस लोखंडाचे रेलिंग तोडून सरळ ट्रॅकवर जाऊन कोसळली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा