Accident: पुलावरून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली प्रवासी बस, ४ जणांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानच्या दौसा येथे एका प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर या अपघातात २४ जण जखमी झाले आहे. या अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात डीएमसह सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हा अपघात नॅशनल हायवे २१वर झाला. येथे एक प्रवासी बस पुलाचे रेलिंग सोडून खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळली. यामुळे रेल्वेच्या प्रवासालाही ब्रेक लागला.


दौसाचे डीएम कमर चौधरी यांच्या माहितीनुसार रविवारी रात्री सवा दोन वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे २१वर हा भीषण रस्ते अपघात ाला. येथे हरिद्वार येथून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलाचे रेलिंग तोडून ही बस खाली कोसळली. ही बस थेट जयपूर दिल्ली रेल्वे मार्गाच्या ट्रॅकवर कोसळली. बस पुलावर खाली कोसळून रेल्वे ट्रॅकवर पडल्याची बातमी ऐकून तातडीने तेथे पोलीस तसेच अॅम्ब्युलन्सची गाडी रवाना झाली.


अपघातानंतर काही वेळात जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघाताची माहिती जशी रेल्वे कंट्रोल रूमला मिळाली तसे तत्काळ जयपूर-दिल्ली रेल्वेमार्गावरील अप आणि डाऊन रेल्वे मार्ग बंद करण्यात आले.



पुलावरून खाली कोसळून पलटली बस


मिळालेल्या माहितीनुसार हरिद्वार येथून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या या प्रवासी बसचे रात्री सव्वा दोनच्या सुमारास नियंत्रण सुटले. वेगात धावणारी ही बस लोखंडाचे रेलिंग तोडून सरळ ट्रॅकवर जाऊन कोसळली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.