लवकरच महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार

एक पुण्यात तर दुसरी धाराशिवला


मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरीचे आयोजन पुण्यात केले आहे. यंदा दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एक पुण्यात दुसरी धाराशिवमध्ये रंगणार आहे.


महाराष्ट्र केसरी २०२३ मधील ६६ वी स्पर्धा पुण्यामध्ये पार पडणार आहे. पुण्याजवळ फुलगाव येथे जंगी कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. तीन दिवस या थरारारा बाकी असून ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान हा फड रंगणार आहे. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ सहभागी होणार आहेत. माती आणि गादी गटांत स्पर्धा होणार असून या थरारामध्ये ८४० मल्ल सहभागी होणार आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते होणार उदघाटन होणार आहे.


स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. तर दुसरी महाराष्ट्र केसरी धाराशिवमध्ये पार पडणार आहे. १६ ते २० नोव्हेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी स्कॉर्पिओ एन आणि १ लाख, २० बुलेट अशी बक्षिसे असणार आहेत.

Comments
Add Comment

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक

महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँड - मुख्यमंत्री

नागपूर : महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य

वकिलांना ३ महिने काळ्या कोटापासून मिळणार सुट्टी; जाणून घ्या कारण

पुणे : वाढत्या उष्णतेमुळे वकिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात पारंपरिक काळा