लवकरच महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार

  105

एक पुण्यात तर दुसरी धाराशिवला


मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरीचे आयोजन पुण्यात केले आहे. यंदा दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एक पुण्यात दुसरी धाराशिवमध्ये रंगणार आहे.


महाराष्ट्र केसरी २०२३ मधील ६६ वी स्पर्धा पुण्यामध्ये पार पडणार आहे. पुण्याजवळ फुलगाव येथे जंगी कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. तीन दिवस या थरारारा बाकी असून ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान हा फड रंगणार आहे. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ सहभागी होणार आहेत. माती आणि गादी गटांत स्पर्धा होणार असून या थरारामध्ये ८४० मल्ल सहभागी होणार आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते होणार उदघाटन होणार आहे.


स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. तर दुसरी महाराष्ट्र केसरी धाराशिवमध्ये पार पडणार आहे. १६ ते २० नोव्हेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी स्कॉर्पिओ एन आणि १ लाख, २० बुलेट अशी बक्षिसे असणार आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या