लवकरच महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार

एक पुण्यात तर दुसरी धाराशिवला


मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरीचे आयोजन पुण्यात केले आहे. यंदा दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एक पुण्यात दुसरी धाराशिवमध्ये रंगणार आहे.


महाराष्ट्र केसरी २०२३ मधील ६६ वी स्पर्धा पुण्यामध्ये पार पडणार आहे. पुण्याजवळ फुलगाव येथे जंगी कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. तीन दिवस या थरारारा बाकी असून ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान हा फड रंगणार आहे. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ सहभागी होणार आहेत. माती आणि गादी गटांत स्पर्धा होणार असून या थरारामध्ये ८४० मल्ल सहभागी होणार आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते होणार उदघाटन होणार आहे.


स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. तर दुसरी महाराष्ट्र केसरी धाराशिवमध्ये पार पडणार आहे. १६ ते २० नोव्हेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी स्कॉर्पिओ एन आणि १ लाख, २० बुलेट अशी बक्षिसे असणार आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये