Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल; '२० कोटी रुपये दे नाहीतर...

काय म्हटले आहे मेलमध्ये?


मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. म्हणूनच की काय त्यांच्याकडे तब्बल वीस कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेल (Threat mail) त्यांना पाठवण्यात आला आहे. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी या मेलमधून देण्यात आली आहे. संबंधित मेलविषयी पोलिसांना कळवण्यात आले असून हा मेल कोणी पाठवला याचा तपास सुरु आहे.


काल म्हणजेच २७ ऑक्टोबरला मुकेश अंबानी यांच्या अकाऊंटवर एक मेल आला. एका अज्ञात व्यक्तीने इंग्रजीतून हा मेल पाठवला होता. मुकेश अंबानी यांच्याकडे पैशाची मागणी करत त्यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत."


हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.



धमकीची ही पहिलीच वेळ नाही...


मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अँटिलियाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती. हे लक्षात घेऊन मुकेश अंबानींना Z+ सुरक्षा देण्यात आली होती, तर नीता अंबानींना Y+ दर्जाची सुरक्षा दिली होती. तसेच सीआरपीएफ (CRPF) ही अंबानी कुटुंबाच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा पुरवते.

Comments
Add Comment

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार; मुख्यमंत्र्यांची परिषदेत माहिती

मुंबई : बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, आता या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा