Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल; '२० कोटी रुपये दे नाहीतर...

काय म्हटले आहे मेलमध्ये?


मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. म्हणूनच की काय त्यांच्याकडे तब्बल वीस कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेल (Threat mail) त्यांना पाठवण्यात आला आहे. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी या मेलमधून देण्यात आली आहे. संबंधित मेलविषयी पोलिसांना कळवण्यात आले असून हा मेल कोणी पाठवला याचा तपास सुरु आहे.


काल म्हणजेच २७ ऑक्टोबरला मुकेश अंबानी यांच्या अकाऊंटवर एक मेल आला. एका अज्ञात व्यक्तीने इंग्रजीतून हा मेल पाठवला होता. मुकेश अंबानी यांच्याकडे पैशाची मागणी करत त्यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत."


हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.



धमकीची ही पहिलीच वेळ नाही...


मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अँटिलियाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती. हे लक्षात घेऊन मुकेश अंबानींना Z+ सुरक्षा देण्यात आली होती, तर नीता अंबानींना Y+ दर्जाची सुरक्षा दिली होती. तसेच सीआरपीएफ (CRPF) ही अंबानी कुटुंबाच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा पुरवते.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण