Mohan Bhagwat : हा हिंदू देश... हिंदूंनीच मुस्लिम लोकांचा सांभाळ केला!

नागपुरातील व्याख्यानात मोहन भागवत यांचं वक्तव्य


नागपूर : इस्राईल आणि हमासमध्ये (Israel Hamas war) चालू असलेल्या संघर्षामुळे दोन्ही बाजूंकडून साडेपाच हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आरएसएसचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी प्रतापनगर शिक्षण संस्थेने आयेजित केलेल्या एका व्याख्यानात भाष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे झाल्याच्या निमित्ताने हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळेस 'देशात सर्व धर्म आणि पंथांचा आदर करणारा एक धर्म आहे, हा हिंदूंचा (Hindu) देश आहे, सर्वांची काळजी घेणार्‍यालाच हिंदू असं म्हणतात आणि हे फक्त हिंदुस्थानच (Hindusthan) करतो', असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.


मोहन भागवत म्हणाले, जगात बाकी सगळीकडे मारामारी होत आहे. तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, युक्रेन युद्धाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, हमास आणि इस्राईलमध्येही युद्ध होत आहे. मात्र, आपल्या देशात अशा मुद्द्यावर कधीही भांडण झालेलं नाही. आम्ही या मुद्द्यावर कधीही लढलो नाही, अशा मुद्द्यांवर आम्ही कोणाशीही भांडत नाही, याचं कारण आपण हिंदू आहोत आणि हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ आपण इतर धर्म नाकारतो असा नाही. जर तुम्ही हिंदू बोलत असाल तर आम्ही मुस्लिमांनाही संरक्षण दिले हे सांगायची गरज नाही. सर्व धर्माचे रक्षण फक्त हिंदूच करतात. भारत हा एकमेव देश आहे जिथे प्रत्येक धर्म स्वीकारला जातो. इतरांनी तसे केले नाही. हिंदू धर्म सर्व पंथांचा आदर करतो. हिंदूंनी मुस्लिम लोकांचा सांभाळ केला, हे भारतच करू शकतो, असं मोहन भागवत म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन आपण अनुकरण करावं असंच आहे. त्यांचं अनुकरण म्हणजे, घोड्यावर बसण्याएवढं सोपं नाही, त्यांनी ज्या गुणांच्या आधारावर कर्तृत्व गाजवलं ते गुण कुठल्याही काळात महत्वाचे आहेत. त्यांना काय करायचं हे स्पष्ट माहित होतं, हा त्यांचा गुण होता. लोकांचं दुःख त्यांना बघवलं गेलं नाही, लोकांची दयनीय अवस्था, महिला असुरक्षितता, महिलांची दुर्दशा पाहून त्यांच्या मनात शोक निर्माण होत होता. शिवाजी महाराजांच्या काळात आई -वडील संस्कार द्यायचे. मात्र, आजकाल आई वडील हे मोबाईलमध्ये असतात, असं एक वास्तव मोहन भागवतांनी मांडलं.



आपल्याला माणसं राखता आली पाहिजेत


महाराजांनी मित्रांचा गोतावळा जमवला शिवाजी महाराज पुण्यात आल्यावर कसबा गणपती शोधून काढला आणि शेती करायला सुरुवात केली. लोकांना वसवलं. तरुण मित्र जमा केले, त्यांचाकडे असलेली कला निरखून लोक प्रेमानं जोडले. मित्रांचे दोष प्रेमानं दूर केले, संकटात मदत करत मैत्री केली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजा बनण्याची वेळ आली. तेव्हा प्रजेच्या संरक्षणासाठी ते राजा झाले. आपल्याला माणसं राखता आली पाहिजेत. तेव्हा आपण सुरक्षित असतो, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.



महाराजांचं मुसलमानांशी वैर नव्हतं


तेलंगणाचा कुतुबशाह शिवाजी महाराजांना घाबरला होता. शिवाजी महाराज यांचं विदेशी मुसलमानांशी भांडण होतं. भारतात राहणाऱ्या मुसलमानांशी वैर नव्हतं. शिवाजी महाराजांनी एक-एक माणूस उभा केला होता. शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभी केली, त्यामुळे त्यांनी उभे केलेले राज्य लोकशाहीचे राहिले, असंही मोहन भागवत म्हणाले. तसेच, अफजल खान लोकांना त्रास देत असताना धैर्य ठेवून योग्य वेळेची वाट पाहिली. अफजल खान याला भेटायला जाऊन त्याचा डाव त्याच्यावरचं उलटवणं हे साहस आणि धैर्य बुद्धी चातुर्य महाराजांमध्ये होतं, असंही ते म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांची वाहनखरेदी धडाक्यात, गतवर्षी पेक्षा यंदा १,१५२ वाहनांची वाढ

पुणे : पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण