UT69 : तुरुंग ही पृथ्वीवरील सगळ्यात भयानक जागा आहे - राज कुंद्रा

मुंबई: शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांचा बायोपिक यूटी ६९चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात खुद्द राज कुंद्राने आपली भूमिका बजावली आहे. एक अभिनेता म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. त्यांचा यूटी ६९ हा सिनेमा त्यांनी जेलध्ये घालवलेल्या २ महिन्यांच्या अनुभवावरील आहे.


ट्रेलरमध्ये राज कुंद्रा यांनी जेलमध्ये घालवलेल्या कटू आठवणींची झलक दाखवली आहे. हा सिनेमा शाहनवाज अली यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या ३ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आपला सिनेमा यूटी ६९च्या एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान राज कुंद्रा यांनी सिनेमाच्या विषयाबाबत खुलेपणाने बातचीत केली.


त्यांनी सांगितले की जेलमधील त्यांचे कसे अनुभव आहेत. त्यांनी सांगितले, त्यांच्यासाठी तो जेलमधील काळ किती कठीण होता. अशातच त्यांची पत्नी आणि कुटुंबाने यातून बाहेर काढण्यास मदत केली. ते ६३ दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते.दरम्यान,मी प्रार्थना करतो की हे दिवस कोणाच्याच नशीबी येऊ नयेत.


 


तुरुंग ही पृथ्वीवरील सगळ्यात भयानक जागा


तुरुंगात आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाबाबत राज कुंद्रा म्हणाले, जेव्हा तुम्ही ब्रिटीश नागरिकाला एका अशा घटनेत तुरुंगात घेऊन जाता तेव्हा सगळेच हास्यास्पद होते. ज्या पद्धतीने तुम्हाला जेवण दिले जाते. पाणी असलेली डाळ, राहण्याची जागा. माझ्या गुडघ्याला प्रॉब्लेम होता त्यामुळे मला इंडियन टॉयलेटमध्ये बसता येत नव्हते. तेव्हा मला इंग्लिश टॉयलेट दिला जातो. ते इतके भयानक होते. तुम्ही सिनेमात पाहू शकता काय काय घडले होते ते. अमेरिकन जेल आणि सिनेमात जे तुरुंग दाखवतात तसेच तुरुंग नसतात. जेलचा अंधारमय भाग आम्ही पाहिला आहे. इमानदारीने सांगू तर तुरुंग ही पृथ्वीवरील सगळ्यात भयानक जागा आहे.


Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता