Operation Ajay: इस्त्रायलवरून २१२ भारतीयांना घेऊन दिल्लीत पोहोचले विमान

नवी दिल्ली: हमासविरुद्द सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्त्रायलच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तेथून परत आणण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय लाँच केले. या ऑपरेशन अंतर्गत २१२ भारतीयांना घेऊन इस्त्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून पहिले विमान दिल्लीला पोहोचले आहे.


इस्त्रायलच्या वेळेनुसार भारतीय नागरिकांनी भरलेले हे विमान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बेन गुरियन विमानतळावरून निघाले. या विमानात २१२ प्रवासी होते. एअर इंडियाचे हे विमान शुक्रवारी सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचले आहे. दिल्ली एअरपोर्टवर राजीव चंद्रशेखर यांनी भारतीय नागरिकांचे स्वागत केले.


 


भारत सरकारने इस्त्रायल आणि हमास या युद्धादरम्यान इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय लाँच केले आहे. ७ ऑक्टोबरला युद्ध सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने इस्त्रायलला जाणारी सर्व विमाने रद्द केली होती. यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्त्रायलमध्ये अडकले होते.


विशेष बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार ज्या लोकामना भारतात परत आणत आहे त्यांना कोणतेही प्रकारचे भाडे द्यावे लागत नाही आहे. इस्त्रायलमध्ये १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात.



तेल अवीवमध्ये एअरपोर्टवर गर्दी


ऑपरेशन अजय अंतर्गत भारतात येणाऱ्या विमानात चढण्यासाठी इस्त्रायलच्या तेल अवीवच्या एअरपोर्टवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. परतणाऱ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Comments
Add Comment

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज सेवा तीर्थ, कर्तव्य भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन-१ आणि २'चे उद्घाटन करणार आहेत. नव्याने

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद