Operation Ajay: इस्त्रायलवरून २१२ भारतीयांना घेऊन दिल्लीत पोहोचले विमान

नवी दिल्ली: हमासविरुद्द सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्त्रायलच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तेथून परत आणण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय लाँच केले. या ऑपरेशन अंतर्गत २१२ भारतीयांना घेऊन इस्त्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून पहिले विमान दिल्लीला पोहोचले आहे.


इस्त्रायलच्या वेळेनुसार भारतीय नागरिकांनी भरलेले हे विमान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बेन गुरियन विमानतळावरून निघाले. या विमानात २१२ प्रवासी होते. एअर इंडियाचे हे विमान शुक्रवारी सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचले आहे. दिल्ली एअरपोर्टवर राजीव चंद्रशेखर यांनी भारतीय नागरिकांचे स्वागत केले.


 


भारत सरकारने इस्त्रायल आणि हमास या युद्धादरम्यान इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय लाँच केले आहे. ७ ऑक्टोबरला युद्ध सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने इस्त्रायलला जाणारी सर्व विमाने रद्द केली होती. यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्त्रायलमध्ये अडकले होते.


विशेष बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार ज्या लोकामना भारतात परत आणत आहे त्यांना कोणतेही प्रकारचे भाडे द्यावे लागत नाही आहे. इस्त्रायलमध्ये १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात.



तेल अवीवमध्ये एअरपोर्टवर गर्दी


ऑपरेशन अजय अंतर्गत भारतात येणाऱ्या विमानात चढण्यासाठी इस्त्रायलच्या तेल अवीवच्या एअरपोर्टवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. परतणाऱ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा