Operation Ajay: इस्त्रायलवरून २१२ भारतीयांना घेऊन दिल्लीत पोहोचले विमान

  119

नवी दिल्ली: हमासविरुद्द सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्त्रायलच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तेथून परत आणण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय लाँच केले. या ऑपरेशन अंतर्गत २१२ भारतीयांना घेऊन इस्त्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून पहिले विमान दिल्लीला पोहोचले आहे.


इस्त्रायलच्या वेळेनुसार भारतीय नागरिकांनी भरलेले हे विमान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बेन गुरियन विमानतळावरून निघाले. या विमानात २१२ प्रवासी होते. एअर इंडियाचे हे विमान शुक्रवारी सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचले आहे. दिल्ली एअरपोर्टवर राजीव चंद्रशेखर यांनी भारतीय नागरिकांचे स्वागत केले.


 


भारत सरकारने इस्त्रायल आणि हमास या युद्धादरम्यान इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय लाँच केले आहे. ७ ऑक्टोबरला युद्ध सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने इस्त्रायलला जाणारी सर्व विमाने रद्द केली होती. यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्त्रायलमध्ये अडकले होते.


विशेष बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार ज्या लोकामना भारतात परत आणत आहे त्यांना कोणतेही प्रकारचे भाडे द्यावे लागत नाही आहे. इस्त्रायलमध्ये १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात.



तेल अवीवमध्ये एअरपोर्टवर गर्दी


ऑपरेशन अजय अंतर्गत भारतात येणाऱ्या विमानात चढण्यासाठी इस्त्रायलच्या तेल अवीवच्या एअरपोर्टवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. परतणाऱ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Comments
Add Comment

कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार

रोजगार योजना, सुदर्शन चक्र मिशन, जीएसटी कपात, पहिली सेमीकंडक्टर चिप, ऊर्जा स्वयंपूर्णता आणि घुसखोरीच्या मुद्यावर काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून १००

पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, नेहरू आणि इंदिरा गांधींना टाकले मागे

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ काळ भाषण देण्याचा

भारतीय सैन्यात अग्निवीरांची संख्या वाढणार

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली चांगली कामगिरी नवी दिल्ली : केंद्र सरकारने जेव्हा अग्निपथ योजना सुरू केली, तेव्हा

‘ऑपरेशन सिंदूर’मधील ३६ एअर वॉरियरना शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली: पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक व निर्णायक कारवाई करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या ३६ जवानांना

‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सैन्याच्या शौर्याची प्रशंसा नवी दिल्ली : या वर्षी आपल्याला दहशतवादाचे