Operation Ajay: इस्त्रायलवरून २१२ भारतीयांना घेऊन दिल्लीत पोहोचले विमान

नवी दिल्ली: हमासविरुद्द सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्त्रायलच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तेथून परत आणण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय लाँच केले. या ऑपरेशन अंतर्गत २१२ भारतीयांना घेऊन इस्त्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून पहिले विमान दिल्लीला पोहोचले आहे.


इस्त्रायलच्या वेळेनुसार भारतीय नागरिकांनी भरलेले हे विमान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बेन गुरियन विमानतळावरून निघाले. या विमानात २१२ प्रवासी होते. एअर इंडियाचे हे विमान शुक्रवारी सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचले आहे. दिल्ली एअरपोर्टवर राजीव चंद्रशेखर यांनी भारतीय नागरिकांचे स्वागत केले.


 


भारत सरकारने इस्त्रायल आणि हमास या युद्धादरम्यान इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय लाँच केले आहे. ७ ऑक्टोबरला युद्ध सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने इस्त्रायलला जाणारी सर्व विमाने रद्द केली होती. यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्त्रायलमध्ये अडकले होते.


विशेष बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार ज्या लोकामना भारतात परत आणत आहे त्यांना कोणतेही प्रकारचे भाडे द्यावे लागत नाही आहे. इस्त्रायलमध्ये १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात.



तेल अवीवमध्ये एअरपोर्टवर गर्दी


ऑपरेशन अजय अंतर्गत भारतात येणाऱ्या विमानात चढण्यासाठी इस्त्रायलच्या तेल अवीवच्या एअरपोर्टवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. परतणाऱ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा