Devendra Fadnavis : कोकणच्या विकासाकडे राज्य शासनाचे विशेष लक्ष; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मंडणगड : शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राज्य शासनाचे कोकणच्या विकासावर विशेष लक्ष असल्याचे व विकासाचा अनुशेष गतीने भरून काढणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंडणगड येथे केले.


न्यायालयाच्या उद्घाटनाकरिता मंडणगड येथे आलेले असताना भिंगळोली येथे भारतीय जनता पार्टीच्या मंडणगड तालुका कार्यालयाचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, श्रीराम इदाते, दापोली तालुका अध्यक्ष संजय सावंत, मंडणगड तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे, सचिन थोरे, अशोक गोविलकर, गिरीश जोशी, दादा कोकाटे, उपस्थित होते.


यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या तत्त्वाने भारतीय जनता पक्ष लोकसभा महाविजय २०२४ करिता सज्ज झाला आहे. देशाच्या विकासात हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे. विकासाचा रथ पुढे नेत असताना कोकणच्या विकासावर शिंदे सरकारने विशेष लक्ष दिले आहे. येथे पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मितीस चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नात मंडणगडमध्ये नवे न्यायालय सुरू केले असून तालुक्याच्या विविध समस्या, प्रश्नांवर पार्टीच्या माध्यमातून नजीकच्या काळात निश्चितच उत्तरे शोधली जातील.


कार्यालय सुरू केल्याबद्दल तालुका, जिल्हा पदाधिकाऱ्यांचे कौतुक करताना भाजप पार्टीचे कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांकरिता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हक्काची जागा आहे. येथे सामान्यांच्या सर्व प्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया. अतिशय विश्वासाचे ठिकाण म्हणून मंडणगडचे कार्यालय नावारूपास येईल आणि लोकांचा विश्वास कार्यालयावर बसेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या