'शिवसेनेच्या नावावर तुम्ही चोऱ्याच केल्या, ठाकरे पिता-पुत्र म्हणजे जागतिक चोर आणि संजय राऊत हा चिंधीचोर!'

सोलापूर : लंडनमधून महाराष्ट्रात १६ नोव्हेंबर रोजी वाघनखं (Wagh Nakha) मुंबईत आणण्यात येणार आहेत. त्याआधीच ही वाघनखं शिवरायांची आहेत का? यावरुन वाद सुरु झाला आहे. या वादात तोंडसुख घेणारे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या आरोपांना भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल करताना ढोबळे म्हणाले की, 'आमदार, खासदार सोडून गेले त्यामुळे ठाकरे पितापुत्र झोपेत बरळतात. उर बडवून घेतात, शिवसेनेच्या नावावर तुम्ही चोऱ्याच केल्या, आंतरराष्ट्रीय चोर म्हणून तुमचा उल्लेख होतो, अशी टीका लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. तर खासदार संजय राऊत यांना भाडेकरू, चिंधीचोर असे म्हणत चांगलेच फटकारले.


लक्ष्मण ढोबळे म्हणाले, शिवरायांच्या नावावर मातोश्री एक, मातोश्री दोन उभारणारे आज वाघनखांवर संशय घेत आहेत. सरकारला विनाकारण बदनाम करणाऱ्यांवर जरब, दहशत बसावी यासाठी ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. या वाघ नखांचा तुम्हाला उपयोग होणार नाही पण तुमच्यावर दहशत राहील.


दुर्दैवाने, गेली ५० वर्षे भगव्या झेंड्याखाली ज्यांनी अध्यात्माची लोकशाही मांडली त्यांचे दिवटे आज छत्रपतींच्या भगव्याला आणि वाघनखांना विरोध करत आहेत. जगातील लोकांना मान्यता दिलेल्या वाघनखांबद्दल पितापुत्र चुकीचे बोलत आहेत. माझा बाप चोरीला गेला असे म्हणतात. चिन्ह गेले, आमदार सोडून गेले तरी देखील वावटळीसारखे ओरडत फिरत आहेत. सरकारला बदनाम करत आहेत, अशा खोटारड्या, रिकामटेकड्या भाषा पंडितांनी हे बंद केले पाहिजे. वाघनखांना पाहून मांजराच्या वाटेने जाणा-यांनी शांत बसावे यासाठी ती वाघनखं आणली जाणार आहेत, असे ढोबळे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य