गुहागर: राज्यात सगळकडेच गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे. त्यातच रत्नागिरीच्या गुहागरमध्ये एक विचित्र अपघात घडला. येथील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अचानक ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसला.
संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. गुहारच्या पाचेरी आगर गावात ही दुर्घटना घडली.
या पाचेरी आगार गावात रस्त्यावरून संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होते. गणेशभक्त नाचत-गात आपल्या बाप्पाला निरोप देत होते. त्याचवेळेस पिक अप टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो या मिरवणुकीत घुसला. य
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दीपक भुवड आणि कोमल भुवड अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर ९ जण जखमी झाले.
या घटनेनंतर जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यापैकी तीन जणांना उपचारानंतर सोडण्यात आले. तर ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…