नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना, गोदावरी नदीत २ जण बुडाले

नाशिक: राज्यात सगळीकडेच गणपती विसर्जनाचा(ganpati visarjan) उत्साह पाहायला आहे. मात्र त्यातच नाशिकमध्ये या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. गणपती विसर्जन करताना दोन जण बुडाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहहे. नाशिकच्या गोदावरी नदीत विसर्जनासाठी गेलेले नदीच्या पाण्यात बुडाले. अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये या गणपती उत्साहाला गालबोट लागले.


नाशिकच्या गोदावरी नदीत दोघे जण बुडाले तर वालदेवी धरणात तीन जण बुडाले. या धरणात बुडालेल्या व्यक्तींपैकी दोन महाविद्यालयीन तरूण तर एक विवाहित तरूणाचा समावेश आहे. गणपती विसर्जन करताना बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनही युद्ध पातळीवर सुरू आहे.


प्राथमिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात गोदावरील नदीत बुडालेल्या तरुणांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तर वालदेवी धरणात विसर्जन करताना तीन जण बुडाले. या सर्व बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



रायगडमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट


गणपती विसर्जनासाठी गेलेले ४ जण उल्हास नदीत बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रायगडमध्ये कर्जत येथे उल्हास नदीत चार गणेशभक्त विसर्जनाला गेले होते. यावेळेस पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चारजण वाहून गेले.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये