नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना, गोदावरी नदीत २ जण बुडाले

नाशिक: राज्यात सगळीकडेच गणपती विसर्जनाचा(ganpati visarjan) उत्साह पाहायला आहे. मात्र त्यातच नाशिकमध्ये या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. गणपती विसर्जन करताना दोन जण बुडाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहहे. नाशिकच्या गोदावरी नदीत विसर्जनासाठी गेलेले नदीच्या पाण्यात बुडाले. अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये या गणपती उत्साहाला गालबोट लागले.


नाशिकच्या गोदावरी नदीत दोघे जण बुडाले तर वालदेवी धरणात तीन जण बुडाले. या धरणात बुडालेल्या व्यक्तींपैकी दोन महाविद्यालयीन तरूण तर एक विवाहित तरूणाचा समावेश आहे. गणपती विसर्जन करताना बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनही युद्ध पातळीवर सुरू आहे.


प्राथमिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात गोदावरील नदीत बुडालेल्या तरुणांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तर वालदेवी धरणात विसर्जन करताना तीन जण बुडाले. या सर्व बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



रायगडमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट


गणपती विसर्जनासाठी गेलेले ४ जण उल्हास नदीत बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रायगडमध्ये कर्जत येथे उल्हास नदीत चार गणेशभक्त विसर्जनाला गेले होते. यावेळेस पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चारजण वाहून गेले.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे