Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच आठपदरी होणार

रस्ते विकास महामंडळाने सादर केला प्रस्ताव


मुंबई : राज्यात वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या गंभीर बनत चालली आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने कोणत्याही वेळी एक्स्प्रेस वेजवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते. पण यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. म्हणूनच रस्ते विकास महामंडळाने एक नवा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai Pune Expressway) लवकरच आठपदरी करण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळानं (Maharashtra State Road Development Corporation) राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिला आहे.


पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. शिवाय लोणावळा आणि पुण्यातील इतर पर्यटनस्थळे पाहण्यासाठी येणारे पर्यटक देखील याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे आठवडाअखेरीस आणि सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सध्या सहापदरी असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे दोन मार्गिका वाढवून आठपदरी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर पुढील तीन वर्षांत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठपदरी झाल्यास बाहतूक कोंडी कमी होऊ शकेल आणि अपघातांचे प्रमाणही टळू शकेल, अशी आशा आहे. सरकारने महामंडळाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होऊ शकेल व पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल. एकीकडे, वेगाने काम सुरू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प आणि दुसरीकडे आठ लेन करण्याचा प्रस्ताव, यामुळे मुंबईहून (Mumbai News) पुण्याकडे (Pune) जाणाऱ्यांसह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून विमान इंधनावरील 'व्हॅट'मध्ये ११ टक्क्यांची कपात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; 'एटीएफ'वरील व्हॅट १८ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांवर मुंबई : पश्चिम

Ravi Shastri : 'हाच होणार भारताच्या T20 संघाचा कर्णधार'

मुंबई : भारताच्या टी २० संघाचा कर्णधार कोण होणार यावरून क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवचा

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या