Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच आठपदरी होणार

रस्ते विकास महामंडळाने सादर केला प्रस्ताव


मुंबई : राज्यात वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या गंभीर बनत चालली आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने कोणत्याही वेळी एक्स्प्रेस वेजवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते. पण यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. म्हणूनच रस्ते विकास महामंडळाने एक नवा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai Pune Expressway) लवकरच आठपदरी करण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळानं (Maharashtra State Road Development Corporation) राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिला आहे.


पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. शिवाय लोणावळा आणि पुण्यातील इतर पर्यटनस्थळे पाहण्यासाठी येणारे पर्यटक देखील याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे आठवडाअखेरीस आणि सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सध्या सहापदरी असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे दोन मार्गिका वाढवून आठपदरी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर पुढील तीन वर्षांत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठपदरी झाल्यास बाहतूक कोंडी कमी होऊ शकेल आणि अपघातांचे प्रमाणही टळू शकेल, अशी आशा आहे. सरकारने महामंडळाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होऊ शकेल व पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल. एकीकडे, वेगाने काम सुरू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प आणि दुसरीकडे आठ लेन करण्याचा प्रस्ताव, यामुळे मुंबईहून (Mumbai News) पुण्याकडे (Pune) जाणाऱ्यांसह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना

Government Hospital Catering Services : सरकारी रुग्णालयांतील खानपान सेवा आता महिला बचत गटांकडे

- २०० पेक्षा कमी खाटांच्या रूग्णालयांसाठी निर्णय; पारदर्शक गुणांकनाद्वारे जिल्हा स्तरावर निवड होणार मुंबई :

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

मुंबई : ग्लॅमर आणि झगमगाटाने वेढलेल्या सिनेसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य खरोखरच तितके सुखी आणि चमकदार

Mumbai Doctors Strike : मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप; ओपीडी बंद, रुग्णांचे हाल सुरू

मुंबई : मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांना मोठा मनस्ताप सहन