Chandrababu Naidu: भ्रष्टाचार प्रकरणात टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  99

नवी दिल्ली : तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंध्र प्रदेशातील ३७१ कोटींच्या कौशल्य विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणार गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना ही अटक केली. माजी मुख्यमंत्री नायडू यांना १४ दिवस राजमुंदरी सेंट्रल जेलमध्ये ठेवले जाईल. हे पाहता तुरुंगाजवळ कलम १४४ लागू करण्यात आले आहे.


नायडू यांना शनिवारी रात्री उशिरा तीन वाजून ४० मिनिटांनी मेडिकल तपासणीसाठी विजयवाडाच्या सरकारी जनरल रुग्णालयात नेण्यात आले होते. याआधी त्यांची १० तास चौकशी करण्यात आली.



एन चंद्राबाबू नायडू यांना कधी केली अटक?


सीआयडीच्या टीमे माजी केंद्रीय मंत्री नायडू यांना शनिवारी सकाळी सहा वाजता नंदयाल शहराच्या ज्ञानपुरम येथील आर के फंक्शन हॉलच्या बाहेर अटक करण्यात आली होती. नायडू जेव्हा आपल्या बसमध्ये झोपले होते तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.



टीडीपीने काय म्हटले?


एन चंद्राबाबू नायडूचा पक्ष टीडीपीने याबाबतची सर्व माहिती सोशल मीडियावर देत म्हटले की नायडू यांच्याविरोधात खोट्या केस दाखल करण्यात आले आहेत. लोक त्यांच्यासोबत आहेत.



काय आहे प्रकरण?


२०१४मध्ये आंध्र प्रदेशातील बेरोजगार तरुणांसाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. यात ३७१ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )