Chandrababu Naidu: भ्रष्टाचार प्रकरणात टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Share

नवी दिल्ली : तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंध्र प्रदेशातील ३७१ कोटींच्या कौशल्य विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणार गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना ही अटक केली. माजी मुख्यमंत्री नायडू यांना १४ दिवस राजमुंदरी सेंट्रल जेलमध्ये ठेवले जाईल. हे पाहता तुरुंगाजवळ कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

नायडू यांना शनिवारी रात्री उशिरा तीन वाजून ४० मिनिटांनी मेडिकल तपासणीसाठी विजयवाडाच्या सरकारी जनरल रुग्णालयात नेण्यात आले होते. याआधी त्यांची १० तास चौकशी करण्यात आली.

एन चंद्राबाबू नायडू यांना कधी केली अटक?

सीआयडीच्या टीमे माजी केंद्रीय मंत्री नायडू यांना शनिवारी सकाळी सहा वाजता नंदयाल शहराच्या ज्ञानपुरम येथील आर के फंक्शन हॉलच्या बाहेर अटक करण्यात आली होती. नायडू जेव्हा आपल्या बसमध्ये झोपले होते तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.

टीडीपीने काय म्हटले?

एन चंद्राबाबू नायडूचा पक्ष टीडीपीने याबाबतची सर्व माहिती सोशल मीडियावर देत म्हटले की नायडू यांच्याविरोधात खोट्या केस दाखल करण्यात आले आहेत. लोक त्यांच्यासोबत आहेत.

काय आहे प्रकरण?

२०१४मध्ये आंध्र प्रदेशातील बेरोजगार तरुणांसाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. यात ३७१ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago