Chandrababu Naidu: भ्रष्टाचार प्रकरणात टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंध्र प्रदेशातील ३७१ कोटींच्या कौशल्य विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणार गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना ही अटक केली. माजी मुख्यमंत्री नायडू यांना १४ दिवस राजमुंदरी सेंट्रल जेलमध्ये ठेवले जाईल. हे पाहता तुरुंगाजवळ कलम १४४ लागू करण्यात आले आहे.


नायडू यांना शनिवारी रात्री उशिरा तीन वाजून ४० मिनिटांनी मेडिकल तपासणीसाठी विजयवाडाच्या सरकारी जनरल रुग्णालयात नेण्यात आले होते. याआधी त्यांची १० तास चौकशी करण्यात आली.



एन चंद्राबाबू नायडू यांना कधी केली अटक?


सीआयडीच्या टीमे माजी केंद्रीय मंत्री नायडू यांना शनिवारी सकाळी सहा वाजता नंदयाल शहराच्या ज्ञानपुरम येथील आर के फंक्शन हॉलच्या बाहेर अटक करण्यात आली होती. नायडू जेव्हा आपल्या बसमध्ये झोपले होते तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.



टीडीपीने काय म्हटले?


एन चंद्राबाबू नायडूचा पक्ष टीडीपीने याबाबतची सर्व माहिती सोशल मीडियावर देत म्हटले की नायडू यांच्याविरोधात खोट्या केस दाखल करण्यात आले आहेत. लोक त्यांच्यासोबत आहेत.



काय आहे प्रकरण?


२०१४मध्ये आंध्र प्रदेशातील बेरोजगार तरुणांसाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. यात ३७१ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत