Jasprit Bumrah : धक्का नव्हे बुमराहने तर आनंदाची बातमी दिली! मुलाचं नाव ठेवलं...

आशिया कप स्पर्धेच्या मध्यातूनच घरी परतलेला जसप्रीत बुमराह झाला बाबा


मुंबई : आशिया चषक २०२३ च्या (Asia Cup 2023) मध्यावर भारतीय संघातून अचानक ब्रेक घेत स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आपल्या घरी परतला होता. त्यामुळे बुमराहने भारतीय संघाला धक्का दिल्याच्या चर्चा होत होत्या. आज नेपाळ विरुद्ध असलेल्या भारताच्या सामन्यात तो खेळताना दिसणार नाही त्यामुळे चाहते निराश झाले होते. पण बुमराहने चाहत्यांना एक वेगळीच आनंदाची बातमी दिली आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. शिवाय बुमराह केवळ आजचा सामना खेळणार नसून सुपर-४ साठी भारतीय संघात पुन्हा सामील होणार आहे.


भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने आज सकाळी मुलाला जन्म दिला. यामुळे बुमराह खूप खुश आहे आणि त्याने आपल्या बाळाचे नावही ठेवले आहे. या जोडप्याने घरातील छोट्या पाहुण्याला 'अंगद' असं नाव दिलं आहे.


जसप्रीत बुमराहने बाबा झाल्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला. त्याने एक्स-हँडलवर लिहिलं की, 'आमचं छोटं कुटुंब मोठं झालं आहे आणि आम्ही कधीच कल्पना केली नसेल इतकं अंतःकरण भरुन आलं आहे! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचं, अंगद जसप्रीत बुमराहचं जगात स्वागत केलं. आमच्या आयुष्यातील हा एक नवीन अध्याय आहे आणि तो आपल्यासोबत घेऊन आलेल्या प्रत्येक गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत'. त्यामुळे आशिया कपमध्ये एकही षटक न टाकता भारतात परतलेल्या बुमराहविषयीच्या चर्चांना आता विराम मिळून आनंद साजरा होत आहे.






Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या