Bhiwandi Building: भिवंडीत इमारत दुर्घटना, २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात रात्री दोन मजल्याची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. यात एका मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण यात जखमी झालेत. अपघाताची माहिती तातडीने आसपासच्या लोकांनी पोलीस तसेच प्रशासनाला दिली. सूनाच मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.


या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका परिसरातील दर्गा रोडवर ही घटना घडली. येथील ही इमार नंबर ४४१ रात्री सव्वाबाराच्या सुमारास अचानक कोसळली. घरातून किंकाळ्यांचे आवाज ऐकू आल्याने परिसर जागा झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील ७ जण दबले गेले आहे. लोकांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने तेथे पोहोचले आणि याची माहिती पोलीस तसेच फायर ब्रिगेडला दिली.


 


दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी फायर ब्रिगेड आणि महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. टीमने मलब्याआखील दबलेल्या लोकांना काढायला सुरूवात केली. बऱ्याच प्रयत्नानंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश आले. या दरम्यान, दोन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



खूप जुनी होती इमारत


ही इमारत खूप जुनी होती अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ही इमारत खाली कऱण्याचे आदेश दिले गेले होते की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. बचावकार्य पूर्ण झाले असून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.
Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध