Bhiwandi Building: भिवंडीत इमारत दुर्घटना, २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात रात्री दोन मजल्याची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. यात एका मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण यात जखमी झालेत. अपघाताची माहिती तातडीने आसपासच्या लोकांनी पोलीस तसेच प्रशासनाला दिली. सूनाच मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.


या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका परिसरातील दर्गा रोडवर ही घटना घडली. येथील ही इमार नंबर ४४१ रात्री सव्वाबाराच्या सुमारास अचानक कोसळली. घरातून किंकाळ्यांचे आवाज ऐकू आल्याने परिसर जागा झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील ७ जण दबले गेले आहे. लोकांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने तेथे पोहोचले आणि याची माहिती पोलीस तसेच फायर ब्रिगेडला दिली.


 


दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी फायर ब्रिगेड आणि महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. टीमने मलब्याआखील दबलेल्या लोकांना काढायला सुरूवात केली. बऱ्याच प्रयत्नानंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश आले. या दरम्यान, दोन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



खूप जुनी होती इमारत


ही इमारत खूप जुनी होती अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ही इमारत खाली कऱण्याचे आदेश दिले गेले होते की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. बचावकार्य पूर्ण झाले असून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा