Bhiwandi Building: भिवंडीत इमारत दुर्घटना, २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात रात्री दोन मजल्याची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. यात एका मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण यात जखमी झालेत. अपघाताची माहिती तातडीने आसपासच्या लोकांनी पोलीस तसेच प्रशासनाला दिली. सूनाच मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.


या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका परिसरातील दर्गा रोडवर ही घटना घडली. येथील ही इमार नंबर ४४१ रात्री सव्वाबाराच्या सुमारास अचानक कोसळली. घरातून किंकाळ्यांचे आवाज ऐकू आल्याने परिसर जागा झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील ७ जण दबले गेले आहे. लोकांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने तेथे पोहोचले आणि याची माहिती पोलीस तसेच फायर ब्रिगेडला दिली.


 


दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी फायर ब्रिगेड आणि महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. टीमने मलब्याआखील दबलेल्या लोकांना काढायला सुरूवात केली. बऱ्याच प्रयत्नानंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश आले. या दरम्यान, दोन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



खूप जुनी होती इमारत


ही इमारत खूप जुनी होती अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ही इमारत खाली कऱण्याचे आदेश दिले गेले होते की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. बचावकार्य पूर्ण झाले असून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे