HSC-SSC supplementary Exam : पुरवणी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीसाठी मिळणार प्रवेश

चंद्रकांत पाटील यांचे आदेश


मुंबई : दहावी - बारावीच्या परीक्षेत (HSC-SSC Exam) नापास झालेल्या, कमी गुण मिळालेल्या तसेच आपल्या गुणांच्या श्रेणीत सुधारणा करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेचे आयोजन केले जाते. मात्र, या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढील पदवीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होतो. हीच प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आदेश जारी केले आहेत. यानुसार बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता पदवीला प्रवेश मिळणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांना पदवीच्या रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आदेश जारी केले आहेत.


बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल काल जाहीर झाला. त्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठांतर्गत संलग्नित महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम (विधी, बीएड व बीपीएड वगळून) आणि पारंपरिक अभ्यासक्रमाकरिता (कला, विज्ञान व वाणिज्य विद्याशाखा) प्रवेश मिळावा आणि कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.


तसेच या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याची दक्षता सर्व अकृषि विद्यापीठांनी घ्यावी, अशी विनंती देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल