Chandrayaan 3 : ‘शिवशक्ती’ नावामुळे महिलांना मिळणार प्रोत्साहन…

Share

पंतप्रधानांच्या घोषणेवर इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया

बंगळुरु : चांद्रयान-३ ची (Chandrayaan 3) मोहिम यशस्वी करुन इस्रोने (ISRO)भारताची मान अख्ख्या जगभरात उंचावली आहे. इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा, असा हा क्षण आहे. याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले व आपल्या भाषणात तीन महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या. त्यापैकी एक म्हणजे विक्रम लँडर (Vikram Lander) चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ (Shivshkati) असे नाव देण्यात आले आहे. यावर आता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या कौतुकाच्या थापेमुळे भविष्यातील मोहिमा यशस्वी करण्याचे बळ मिळाले आहे, अशी भावना शास्त्रज्ञांची होती.

“चांद्रयान -३ ज्या जागेवर लँड झालं त्या जागेचं नाव शिवशक्ती देणं हा समानतेचा देखील संदेश आहे”, अशी प्रतिक्रिया इस्रोने दिली आहे. इस्रो प्रमुख एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी म्हटलं की, “पंतप्रधानांच्या येण्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ च्या लँडिंगमुळे भारताने इतिहास रचला. यामुळे पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. त्याचं भाषण हे आमच्यासाठी प्रेरणादायी होतं. तसेच या लँडिंग पॉईंटचं नाव ‘शिवशक्ती’ ठेवल्यामुळे देशभरातील महिलांचं योगदान देखील यामुळे लोकांना कळणार आहे.”

इस्रोच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ वृंदा व्ही (Vrinda V.) यांनी म्हटलं की, “नारी शक्ती आणि इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, कारण पंतप्रधान मोदी यांनी लँडिंग साईटला ‘शिवशक्ती’ असं नाव दिले आहे. ज्यामुळे देशभरातील महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे.” इस्रोचे शास्त्रज्ञ मुथू सेल्वी (Muthu Selvi) म्हणाले की, “पंतप्रधान मोदींच्या भाषणामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. आपण सशक्त आहोत, पण आपण देशातील इतर महिलांनाही सशक्त केले पाहिजे जेणेकरुन त्या त्यांची स्वप्ने पूर्ण करु शकतील.”

काय आहेत पंतप्रधानांच्या तीन घोषणा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. चांद्रयान-३ ज्या ठिकाणी लँड झालं ती जागा आता ‘शिवशक्ती’ या नावाने ओळखली जाणार आहे. तसेच २०१९ मध्ये चांद्रयान-२ ज्या ठिकाणी क्रॅश झालं त्या जागेचं नाव ‘तिरंगा’ ठेवण्यात आलं आहे. तसेच २३ ऑगस्ट हा दिवस आता ‘राष्ट्रीय अवकाश दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

सुरतमध्ये बहुमजली इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू

सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ…

34 mins ago

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य, १५व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…

1 hour ago

Watch: फुलांच्या माळा आणि ओपन जीप, असे झाले अर्शदीपचे पंजाबमध्ये स्वागत

मुंबई: अर्शदीप सिंह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने…

2 hours ago

औट घटकेचा इंद्र ‘राजा नहूष’

विशेष - भालचंद्र ठोंबरे नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा…

7 hours ago

कवकांची अद्भुत दुनिया ! (भाग १)

निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी,…

7 hours ago

खून पतीचा; जेलमध्ये पत्नी

क्राइम - अ‍ॅड. रिया करंजकर प्रत्येकाला समाजामध्ये नाव कमवायचे असते. त्यामुळे लोक कुठल्याही थराला जाऊन…

7 hours ago