Vardha News : दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात काँग्रेस नेत्याने घरातच थाटला दारुचा गुत्ता

काँग्रेसची मान शरमेने खाली...


वर्धा : विरोधकांच्या आघाडीतील (Opposition Parties) महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress) सत्ताधार्‍यांकडून कायमच टार्गेट केले जाते. आता निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसवर निशाणा साधण्यासाठी आणखी एक गोष्ट हाती लागली आहे. वर्धा (Vardha) या दारुबंदी (Prohibition of alcohol) असलेल्या जिल्ह्यात एक काँग्रेस नेता दारुविक्री करत असल्याचे उघडकीस आल्याने आता सत्ताधार्‍यांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. या घटनेची बरीच चर्चा होत आहे.


वर्धा जिल्हा मुळात 'गांधी जिल्हा' म्हणून ओळखला जातो. काँग्रेस नेते तोच निकष लावत वाटाघाटीत वर्धेची जागा मागून घेतात. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर नीतिमत्ता पाळण्याची जबाबदारी काकणभर अधिकच. पण या प्रकरणात दारुबंदी असतानाही शहर काँग्रेस उपाध्यक्ष असलेल्या नेत्यानेच दारूचे दुकान थाटले. त्यामुळे काँग्रेसची मान खाली घालणारं हे कृत्य म्हणावं लागेल.


गजानन महादेव खंडाळे (Gajanan Khandale) असं या काँग्रेस नेत्याचं नाव आहे. सिंदी रेल्वे येथील त्यांच्या घरी दारू विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड टाकली. त्यात देशी विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करीत माल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक वंदना सोनुने तसेच राजू सोनपित्रे, आनंद भस्मे, प्रशांत श्रीवास्तव, संदेश सोयाम, अमोल पिंपलकर, प्रदीप मस्के, उमेश खमणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी गुन्हा दाखल झाला असेल तर पक्ष कारवाई करेल, असं सांगितलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे