Vardha News : दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात काँग्रेस नेत्याने घरातच थाटला दारुचा गुत्ता

  126

काँग्रेसची मान शरमेने खाली...


वर्धा : विरोधकांच्या आघाडीतील (Opposition Parties) महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress) सत्ताधार्‍यांकडून कायमच टार्गेट केले जाते. आता निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसवर निशाणा साधण्यासाठी आणखी एक गोष्ट हाती लागली आहे. वर्धा (Vardha) या दारुबंदी (Prohibition of alcohol) असलेल्या जिल्ह्यात एक काँग्रेस नेता दारुविक्री करत असल्याचे उघडकीस आल्याने आता सत्ताधार्‍यांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. या घटनेची बरीच चर्चा होत आहे.


वर्धा जिल्हा मुळात 'गांधी जिल्हा' म्हणून ओळखला जातो. काँग्रेस नेते तोच निकष लावत वाटाघाटीत वर्धेची जागा मागून घेतात. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर नीतिमत्ता पाळण्याची जबाबदारी काकणभर अधिकच. पण या प्रकरणात दारुबंदी असतानाही शहर काँग्रेस उपाध्यक्ष असलेल्या नेत्यानेच दारूचे दुकान थाटले. त्यामुळे काँग्रेसची मान खाली घालणारं हे कृत्य म्हणावं लागेल.


गजानन महादेव खंडाळे (Gajanan Khandale) असं या काँग्रेस नेत्याचं नाव आहे. सिंदी रेल्वे येथील त्यांच्या घरी दारू विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड टाकली. त्यात देशी विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करीत माल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक वंदना सोनुने तसेच राजू सोनपित्रे, आनंद भस्मे, प्रशांत श्रीवास्तव, संदेश सोयाम, अमोल पिंपलकर, प्रदीप मस्के, उमेश खमणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी गुन्हा दाखल झाला असेल तर पक्ष कारवाई करेल, असं सांगितलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या