मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण

नंदुरबार(प्रतिनिधी) : मुके प्राणी प्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावतात आणि मालकाचे संरक्षण करून मालकाच्या प्रती इमान निभावतात; हे अनेक प्रसंगातून पाहायला मिळाले आहे. बिबट्याला (bibtya) शिंगावर घेऊन मालकाचे रक्षण करणारी म्हैस मात्र विरळीच म्हटली पाहिजे. चक्क बिबट्याला शिंगावर उचलून फेकत प्राणघातक हल्ल्यातून वृद्धाला वाचवण्याची घटना तळोदा तालुक्यात घडली.


तळोदा शहरातील बादशाह अर्जुन भरवाड (वय ७५ वर्षे) हे म्हशी चारण्यासाठी गेले असता दलेलपूर शिवारातील दिगंबर सूर्यवंशी यांच्या केळीच्या शेतात अचानक बिबट्या आणि त्याचे २ बछडे त्यांच्यावर चालून आले. बादशाह भरवाड यांच्यावर बिबट्याने हल्ला केला तेव्हा त्यांनी झटापट करायचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्याने त्यांच्या उजव्या हाताला जबर चावे घेऊन जखमी केले. दरम्यान, झटापट करताना ते खाली कोसळले.


जखमी वृद्धाने दिलेल्या माहितीनुसार ते खाली पडताच बिबट्या पुन्हा धावून आला त्यावेळी अचानक त्यांची म्हैस मदतीला धावून आली. बिबट्या त्यांच्यावर पुन्हा हल्ला करणार तेवढ्यात म्हशीने बिबट्याला चक्क आपल्या शिंगावर उचलून फेकत झुंज दिली. पाहता पाहता झुझ करून बिबट व बछडे यांना पळवून लावले आणि वृद्धाचे प्राण वाचले.

मागे यांच परिसरात एका १० वर्षाच्या बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती नंतर एका शेतकऱ्याला जायबंदी केले होते. याबाबत वनविभागाने बिबटया जेरबंद करण्यासाठी पिजरा लावावा अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या