Polygamy:एकापेक्षा जास्त विवाह करणे पडणार भारी, या राज्यात लागणार बंदी

दिसपूर: आसामच्या (assam) हिमंता बिस्वा सरमा सरकारने राज्यात बहुविवाह (polygamy) संपवण्याच्या उद्देशाने आपले पाऊल टाकले आहे. यासाठी सरकारने प्रस्ताविद कायद्याबाबत जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक सरकारी सार्वजनिक नोटीस जाहीर करताना लोकांकडून आसाममधील एकापेक्षा अधिक विवाहावर बंदी घालण्याबाबतच्या प्रस्तावित कायद्यावर सल्ले देण्याचे अपील केले आहे.



३० ऑगस्टपर्यंत पाठवू शकता सूचना


गृह तसेच राजकीय विभागाचे प्रधान सचिव यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये लोकांना ३० ऑगस्टपर्यंत इमेल अथवा पोस्टाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात असाही उल्लेख करण्यात आला आहे की आसाम सरकारने बहुविवाहावर बंदी घालण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला रिपोर्ट सरकारला सादर केला आहे. यावर आता सरकार पुढील कारवाई करणार आहे.



आसाम सरकारचे पुढचे पाऊल


रिपोर्टमध्ये म्हटले आहे की राज्य विधानसभा बहुविवाहाच्या प्रथेवर बंदी घालण्यासाठी कायदा बनवण्यास सक्षम आहे. विवाह समवर्ती सूचीच्या अंतर्गत येते ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदा बनवू शकतात.



एकापेक्षा अधिक पत्नी इस्लामचा भाग नाहीत


नोटीसमध्ये तज्ञ समितीच्या रिपोर्टचा हवाला देताना म्हटले की, इस्लामच्या संबंधामध्ये कोर्टाचे म्हणणे आहे की एकापेक्षा अधिक पत्नी असणे हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. पत्नीची संख्या मर्यादित राखणारा कायदा धर्माचे अनुपालन करण्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे एकच विवाहाला समर्थन देणारे कायद्याच्या अनुच्छेद २५चे उल्लंघन करत नाहीत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा