Polygamy:एकापेक्षा जास्त विवाह करणे पडणार भारी, या राज्यात लागणार बंदी

दिसपूर: आसामच्या (assam) हिमंता बिस्वा सरमा सरकारने राज्यात बहुविवाह (polygamy) संपवण्याच्या उद्देशाने आपले पाऊल टाकले आहे. यासाठी सरकारने प्रस्ताविद कायद्याबाबत जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक सरकारी सार्वजनिक नोटीस जाहीर करताना लोकांकडून आसाममधील एकापेक्षा अधिक विवाहावर बंदी घालण्याबाबतच्या प्रस्तावित कायद्यावर सल्ले देण्याचे अपील केले आहे.



३० ऑगस्टपर्यंत पाठवू शकता सूचना


गृह तसेच राजकीय विभागाचे प्रधान सचिव यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये लोकांना ३० ऑगस्टपर्यंत इमेल अथवा पोस्टाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात असाही उल्लेख करण्यात आला आहे की आसाम सरकारने बहुविवाहावर बंदी घालण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला रिपोर्ट सरकारला सादर केला आहे. यावर आता सरकार पुढील कारवाई करणार आहे.



आसाम सरकारचे पुढचे पाऊल


रिपोर्टमध्ये म्हटले आहे की राज्य विधानसभा बहुविवाहाच्या प्रथेवर बंदी घालण्यासाठी कायदा बनवण्यास सक्षम आहे. विवाह समवर्ती सूचीच्या अंतर्गत येते ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदा बनवू शकतात.



एकापेक्षा अधिक पत्नी इस्लामचा भाग नाहीत


नोटीसमध्ये तज्ञ समितीच्या रिपोर्टचा हवाला देताना म्हटले की, इस्लामच्या संबंधामध्ये कोर्टाचे म्हणणे आहे की एकापेक्षा अधिक पत्नी असणे हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. पत्नीची संख्या मर्यादित राखणारा कायदा धर्माचे अनुपालन करण्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे एकच विवाहाला समर्थन देणारे कायद्याच्या अनुच्छेद २५चे उल्लंघन करत नाहीत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१