Bachchu Kadu : मंत्रालयात साप सोडण्याचा बच्चू कडूंचा इशारा

अमरावती : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत. बच्चू कडू यांनी शेतकरी (farmer) आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर अमरावतीत ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली असून यावेळी केलेल्या भाषणात बच्चू कडू यांनी मंत्रालयातील कृषी सचिवांच्या कार्यालयात साप (snake) सोडण्याचा इशारा दिला आहे. येत्या पंधरा दिवसात मजुरांचे प्रश्न सोडवा, अन्यथा मंत्रालयात साप सोडू, अशी धमकी बच्चू कडू यांनी दिली आहे.


बच्चू कडू यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, गावातील मजुरांसाठी कोणतीही योजना नाही. एखाद्या शेतकऱ्याला साप चावला तर त्याच्यासाठी विमा आहे. पण जर एखाद्या मजुराला साप चावला तर त्याला पैसे मिळत नाहीत. हा कुठला न्याय आहे? याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पैसे देण्याचे मान्य केले. मात्र मंत्रालयातील कृषी सचिव ढवळे त्यात आडकाठी आणत आहेत.


कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी सचिवाला इशार देतो की, त्यांनी येत्या पंधरा दिवसांत यावर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडल्याशिवाय राहणार नाही. सापाला जात, धर्म, पंथ नसतो. एका गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार आणि दुसऱ्या गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार नाहीत, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतात काबाडकष्ट करणाऱ्या मजुराला मदत झालीच पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे