Bachchu Kadu : मंत्रालयात साप सोडण्याचा बच्चू कडूंचा इशारा

  179

अमरावती : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत. बच्चू कडू यांनी शेतकरी (farmer) आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर अमरावतीत ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली असून यावेळी केलेल्या भाषणात बच्चू कडू यांनी मंत्रालयातील कृषी सचिवांच्या कार्यालयात साप (snake) सोडण्याचा इशारा दिला आहे. येत्या पंधरा दिवसात मजुरांचे प्रश्न सोडवा, अन्यथा मंत्रालयात साप सोडू, अशी धमकी बच्चू कडू यांनी दिली आहे.


बच्चू कडू यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, गावातील मजुरांसाठी कोणतीही योजना नाही. एखाद्या शेतकऱ्याला साप चावला तर त्याच्यासाठी विमा आहे. पण जर एखाद्या मजुराला साप चावला तर त्याला पैसे मिळत नाहीत. हा कुठला न्याय आहे? याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पैसे देण्याचे मान्य केले. मात्र मंत्रालयातील कृषी सचिव ढवळे त्यात आडकाठी आणत आहेत.


कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी सचिवाला इशार देतो की, त्यांनी येत्या पंधरा दिवसांत यावर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडल्याशिवाय राहणार नाही. सापाला जात, धर्म, पंथ नसतो. एका गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार आणि दुसऱ्या गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार नाहीत, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतात काबाडकष्ट करणाऱ्या मजुराला मदत झालीच पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या