मुंबई-गोवा महामार्गाची दैनावस्था!

Share

नागोठणे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. पण तरीही या महामार्गाची अवस्था ही जैसे थे असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या या महामार्गाची व्यथा सांगणारा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पावसाळ्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना देखील मोठा त्रास होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर एक तरुणाने व्हिडीओ बनवत या महामार्गाची आणि प्रवाशांची व्यथा मांडली आहे. जीवन कदम या तरूणाने मराठी युट्युबर या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. जीवनच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्याने तो एका ठिकाणी थांबून रस्त्याची दूरवस्था दाखवणारा व्हिडिओ ब्लॉग करत होता. त्याचवेळी या मार्गावरुन जाणाऱ्या दुसऱ्या गाडीचा देखील टायर पंक्चर झाला. या महामार्गावर पडलेले खड्डे त्याने या व्हिडीओमध्ये दाखवले आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल होत असताना मनसेनेही याबाबत ट्वीट करत खोचक टीका केली आहे. “एक आडवा नि तिडवा खड्डा, चंद्रावानी पडलाय गं… मेला कंत्राटदार हसतोय कसा गं… चाकरमानी पडलाय गं ! अनुभवा आणि सहन करा!” असं ट्वीट मनसेने केलं आहे. जीवन याने शेअर केलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देत मनसेने हा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी खंत व्यक्त केली आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामावर पुस्तक लिहिता येईल असं म्हणत त्यांनी या महामार्गाच्या कामावर भाष्य केलं आहे. तसेच या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असं आश्वासन देखील त्यांनी या अधिवेशनात दिले.

या महामार्गावरील पनवेल ते कासू या ८४ किमी रस्त्याचं काम सुरु आहे. तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील ४२ किमीचे कामही सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील बारा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु आहे. तर अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे यंदा तरी कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांच्या प्रवासातील विघ्न दूर होणार का, हा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago