तुम्ही कितीही आघाडी करा, पंतप्रधान तर नरेंद्र मोदीच होणार- अमित शाह

  75

नवी दिल्ली : देशातील मोदी सरकारविरोधात विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. विरोधकांनी भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच विरोधकांच्या पक्षांनी मिळून इंडिया ही आघाडी उभारली आहे. या आघाडीत अनेक छोटे मोठे पक्ष सहभाग नोंदवत आहेत. भाजपाप्रणित एनडीएच्या विरोधात सर्व बडे नेतेमंडळी एकत्र आले असून त्यांची आघाडी मोदींची सत्ता उलथवून टाकेल असा विश्वास इंडियाने वेळोवेळी व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावर आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केली. विरोधी पक्षाच्या लोकांना जितक्या आघाडी करायच्या असतील, तेवढ्या त्यांनी कराव्या, पण कितीही, काहीही केलं तरी जिंकणार नरेंद्र मोदीच, तेच पूर्ण बहुमताने पुन्हा पंतप्रधान होणार, असा दावा त्यांनी केला.


"माझं सगळ्या पक्षांना आवाहन आहे की, एखादी निवडणूक जिंकण्यासाठी किंवा केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी एखाद्या विधेयकाचे समर्थन किंवा विरोध करण्याचे राजकारण करू नका. नवीन गठबंधन बनवण्याचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे कोणत्याही विधेयकाचे स्वागत किंवा विरोध करताना देशाचा आणि दिल्लीचा विचार केला पाहिजे. दिल्लीच्या मंत्र्यांनी कितीही भ्रष्टाचार केला तरी विरोधक बनून त्यांचेच समर्थन करायचे, कारण तुम्हाला त्यांच्यासोबत आघाडी करायची आहे, ही पद्धत योग्य नाही. त्यामुळे तुम्ही दिल्लीचा विचार करा, आघाडीचा विचार करू नका; कारण तुम्ही कितीही आघाडी केलीत तर त्यानंतरही पूर्ण बहुमताने नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार," असे अमित शाह यांनी विश्वासाने म्हटले.


"विरोधकांनी देशाचे हित बघावे, जनतेच्या हिताचा विचार करा. आघाडी करून तुम्ही जनतेचा विश्वास जिंकू शकाल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसे होणार नाही. कारण तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जनतेने १० वर्ष सत्ता दिली होती. पण यूपीएच्या काळात १२ हजार कोटींचे घोटाळे बाहेर आले. आतादेखील जर आघाडी करायची म्हणून इतर विरोधक दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करत असाल तर देशातील जनता या गोष्टी पाहत आहे. निवडणुकीत या गोष्टींचा हिशेब जनतेकडून केला जाईल. त्यामुळे मला काँग्रेसच्या लोकांना सांगायचं आहे की दिल्लीतील लोकांचे विधेयकाचं काम झालं की ते तुमच्या आघाडीत येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही फक्त जनतेचा विचार करा," असा खोचक सल्लाही अमित शहांनी दिला.

Comments
Add Comment

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात

LPG Cylinder Price Cut : LPG ग्राहकांना दिलासा! आजपासून कमी झाली किंमत; 'हे' आहेत नवे दर

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी (July 2025) एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत