Income Tax : ज्यांनी अद्याप इन्कम टॅक्स भरला नाही त्यांचे पुढे काय?

काळजी करू नका! ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न भरता येईल! पण १ ते ५ हजारापर्यंत दंड भरावा लागेल

मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ होती. पण तरीही तुम्ही आयटीआर (Income Tax) भरला नसेल, तर तुम्ही ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरू शकता. ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्यासाठी दंडाशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. रिपोर्टनुसार, बहुतेक करदात्यांनी आधीच त्यांचे विवरणपत्र भरले आहे.


ज्यांनी अद्याप प्राप्तिकर भरला नाही मात्र उशीरा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरल्यास, ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. ५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना लेट फी १,००० रुपये आहे, तर इतरांसाठी ५,००० रुपये आहे.


३१ जुलै नंतर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या बाबतीत, तुम्हाला देय असलेल्या कोणत्याही करावर दरमहा १ टक्के दराने दंडात्मक व्याज भरावे लागेल.


जेव्हा शेवटच्या तारखेपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला तर करदात्यांना १ एप्रिलपासून रिफंडच्या तारखेपर्यंत रिफंडच्या रकमेवर दरमहा ०.५ टक्के दराने व्याज मिळते. तथापि, उशीरा रिटर्न फाइलच्या बाबतीत, हे व्याज इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याच्या तारखेपासून परताव्याच्या तारखेपर्यंत दिले जाते.


आयकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३१ जुलैपर्यंत ६.७ कोटीहून अधिक करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. यापैकी, ५.६२ कोटी पेक्षा जास्त आयटीआर करदात्यांनी व्हेरीफाय केले आहे. ३१ जुलैपर्यंत ३.४४ कोटी रिटर्न्सची पडताळणी झाली.


आयटीआर दाखल करणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत ५.८३ कोटीहून अधिक रिटर्न भरले होते, तर यावेळी ही संख्या वाढली आहे. या वर्षी भरलेले एकूण परतावे (ऑडिटसह) सुमारे ८.५ कोटी आहेत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही