Income Tax : ज्यांनी अद्याप इन्कम टॅक्स भरला नाही त्यांचे पुढे काय?

काळजी करू नका! ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न भरता येईल! पण १ ते ५ हजारापर्यंत दंड भरावा लागेल

मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ होती. पण तरीही तुम्ही आयटीआर (Income Tax) भरला नसेल, तर तुम्ही ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरू शकता. ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्यासाठी दंडाशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. रिपोर्टनुसार, बहुतेक करदात्यांनी आधीच त्यांचे विवरणपत्र भरले आहे.


ज्यांनी अद्याप प्राप्तिकर भरला नाही मात्र उशीरा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरल्यास, ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. ५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना लेट फी १,००० रुपये आहे, तर इतरांसाठी ५,००० रुपये आहे.


३१ जुलै नंतर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या बाबतीत, तुम्हाला देय असलेल्या कोणत्याही करावर दरमहा १ टक्के दराने दंडात्मक व्याज भरावे लागेल.


जेव्हा शेवटच्या तारखेपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला तर करदात्यांना १ एप्रिलपासून रिफंडच्या तारखेपर्यंत रिफंडच्या रकमेवर दरमहा ०.५ टक्के दराने व्याज मिळते. तथापि, उशीरा रिटर्न फाइलच्या बाबतीत, हे व्याज इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याच्या तारखेपासून परताव्याच्या तारखेपर्यंत दिले जाते.


आयकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३१ जुलैपर्यंत ६.७ कोटीहून अधिक करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. यापैकी, ५.६२ कोटी पेक्षा जास्त आयटीआर करदात्यांनी व्हेरीफाय केले आहे. ३१ जुलैपर्यंत ३.४४ कोटी रिटर्न्सची पडताळणी झाली.


आयटीआर दाखल करणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत ५.८३ कोटीहून अधिक रिटर्न भरले होते, तर यावेळी ही संख्या वाढली आहे. या वर्षी भरलेले एकूण परतावे (ऑडिटसह) सुमारे ८.५ कोटी आहेत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये