Malkapur Accident : मलकापूरात भीषण अपघात, २ ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक

७ जण ठार; तर २५ ते ३० जण जखमी


बुलढाणा : मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज रात्री तीन वाजता दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने भीषण अपघात (Malkapur Accident) झाला. यामध्ये ७ जण ठार झाले आहेत तर २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. सर्व मृत हे हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार ३५ ते ४० तीर्थयात्री घेऊन एम एच ०८.९४५८ ही ट्रॅव्हल्स (Travels) अमरनाथची तीर्थयात्रा करुन हिंगोलीच्या दिशेने जात होती. तर एम.एच २७ बी.एक्स. ४४६६ ही ट्रॅव्हल्स २५ ते ३० प्रवशांना घेऊन नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्स मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.



मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता


दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. या घटनेत गंभीर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली चमूने शर्थीचे उपचार केले. मात्र २५ जणांपैकी ५ जणांच्या डोक्यात व पोटावर गंभीर जखमा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.


घटनास्थळाला पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, ग्रामीण पोलीस निरीक्षक फरहात मिर्झा यांनी भेट दिली. पोलीस आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नाने गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद