नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही वाहनांची तोडफोड

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संवेदनशील, उपायुक्त मोनिका राऊत यांना आव्हान


नाशिकरोड : सोमवारी पहाटे विहीतगाव येथे दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करून जाळण्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त भुसारे यांची उचलबांगडी केली होती. मात्र विहितगावच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा धोंगडे नगर परिसरात पुन्हा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने नाशिक रोड परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.


राजलक्ष्मी हॉल, धोंगडे नगर या ठिकाणी सोमवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी कोयते व तलवारीच्या सहाय्याने चार गाड्यांचा काचा फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


नाशिक रोड परिसरात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या तोडफोडीच्या घटनांमुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे.


पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देताना दिसत आहे.


धोंगडे नगर येथील तोडफोडीच्या घटनेसंदर्भात येथील अतुल धोंगडे यांनी संशयित आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आरोपींनी तोंडाला काळे कापड बांधले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. दुचाकी वरून हे आरोपी पसार झाले.


दरम्यान परिमंडळ दोनच्या नवनियुक्त उपायुक्त मोनिका राऊत यांच्यापुढे नाशिक रोड परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन वर्षांत 'युएई' आणि सिंगापूरपेक्षा मोठी होणार'

देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्रच मुंबई : महाराष्ट्राचा जीडीपी २०१३ - १४ मध्ये १६ लाख कोटी

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

जमीन भूसंपादन प्रकरणात एसआयटी चौकशीचे महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय