Devendra Fadanvis : 'आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय' : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तीन कोटींचा भूखंड साडेतीनशे कोटींना दिला

उद्धव ठाकरेंच्या काळातील मुंबई मनपातील घोटाळ्यावरून फडणवीसांची टीका


मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या सरकारने जाणीवपूर्वक अंधत्व पत्करले होते आणि मुंबई महापालिका ही त्या काळात भ्रष्टाचाराचे कुरण झाली होती, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना तीन कोटींचा भूखंड साडेतीनशे कोटींना गेल्याचे प्रकरण घडले आहे का? असे विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगच्या अहवालाचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. हे कॅगच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही केवळ झाँकी आहे, असे अनेक घोटाळे बाकी आहेत. असे म्हणत ठाकरेंच्या काळात 'आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी परिस्थिती होती, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.


कॅगच्या अहवालात हे उघडकीस आले आहे की, तीन कोटींचा प्लॉट साडेतीनशे कोटींना देण्यात आला. त्यावरही समाधान न झाल्याने अधिकचे पैसे मिळावेत म्हणून संबंधित लोक कोर्टात गेले आहेत. आपल्याला एक म्हण माहित आहे ती काय तर 'आंधळा दळतो आणि कुत्रं पीठ खातं' या म्हणीप्रमाणे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अंधत्व पत्करुन कशाप्रकारे अनेकांना पीठ खायला दिले जात होते हे यातून स्पष्ट होते. देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मुंबई महापालिकेतल्या मविआ काळातल्या भ्रष्टाचाराविषयी विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून २०२६ पासून होणार सुरु

मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील येथे ६०० टन प्रतिदिन महानगरपालिका घन कचऱ्यापासून ७ मेगावॅट वीज

सरकारी योजनांचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांचा होणार गौरव

मुंबई : विविध योजनांमधून महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या रुग्णसेवांवरील खर्चाच्या