Devendra Fadanvis : 'आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय' : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तीन कोटींचा भूखंड साडेतीनशे कोटींना दिला

उद्धव ठाकरेंच्या काळातील मुंबई मनपातील घोटाळ्यावरून फडणवीसांची टीका


मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या सरकारने जाणीवपूर्वक अंधत्व पत्करले होते आणि मुंबई महापालिका ही त्या काळात भ्रष्टाचाराचे कुरण झाली होती, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना तीन कोटींचा भूखंड साडेतीनशे कोटींना गेल्याचे प्रकरण घडले आहे का? असे विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगच्या अहवालाचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. हे कॅगच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही केवळ झाँकी आहे, असे अनेक घोटाळे बाकी आहेत. असे म्हणत ठाकरेंच्या काळात 'आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी परिस्थिती होती, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.


कॅगच्या अहवालात हे उघडकीस आले आहे की, तीन कोटींचा प्लॉट साडेतीनशे कोटींना देण्यात आला. त्यावरही समाधान न झाल्याने अधिकचे पैसे मिळावेत म्हणून संबंधित लोक कोर्टात गेले आहेत. आपल्याला एक म्हण माहित आहे ती काय तर 'आंधळा दळतो आणि कुत्रं पीठ खातं' या म्हणीप्रमाणे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अंधत्व पत्करुन कशाप्रकारे अनेकांना पीठ खायला दिले जात होते हे यातून स्पष्ट होते. देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मुंबई महापालिकेतल्या मविआ काळातल्या भ्रष्टाचाराविषयी विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.