MNS workers vandalise toll plaza : टोलनाका प्रकरणावर अमित ठाकरे म्हणतात, 'साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे...

  94

स्मितहास्य करत दिली अशी प्रतिक्रिया....


नाशिक : राज ठाकरे (Raj Thackarey) यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackarey) आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी काल अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Highway) प्रवास करत असताना सिन्नर येथील नाक्यावर त्यांचा ताफा अर्धा तास थांबवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. टोल नाका कर्मचाऱ्यांच्या अरेरावी तसेच गैरवर्तणुकीमुळे ही तोडफोड केल्याचे मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सांगितले. नाशिकला पोहोचल्यानंतर अमित ठाकरेंना या तोडफोडीबद्दल कळलं, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेवर 'साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक ॲड झाला', अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी स्मितहास्य करत दिली आहे.


ते म्हणाले, रात्री साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर दिवसभर बरोबर असलेल्या सिक्युरिटीला शिर्डीलाच थांबवून मी माझ्या कामानिमित्त नाशिकला निघालो. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे जाताना सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवण्यात आली. मला नाशिकला काम असल्याने मी नाशिककडे निघालो. सिक्युरिटी दिवसभर बरोबर असल्याने त्यांना शिर्डीलाच थांबायला सांगितलं. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवण्यात आली.


पुढे ते म्हणाले, गाडीला फास्टॅग असतानाही टोलनाक्याचा रॉड खाली आला. तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकाऱ्याने त्यांना फास्टॅगबाबत विचारलं असता आमचे काही इश्यूज आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. तर मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं. दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे, असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर ते म्हणाले, साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक ॲड झाला.



पोलिसांचं म्हणणं काय ?


दरम्यान याबाबत पोलिसांनी माहिती देताना म्हटलं की, "अमित ठाकरे यांचा फास्टॅग ब्लॅकलिस्टेड झाला होता. पण टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना अमित ठाकरेंची गाडी असल्याचं लक्षात आलं नाही. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते टोलनाक्यावर जमले. पण पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून कार्यकर्त्यांना प्रकार नीट समजावून सांगितला. त्यानंतर कार्यकर्ते कोणताही गोंधळ न घालता तिथून निघाले. टोलनाक्याच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आम्ही त्यानंतर इथे दोन तास होतो. पण अचानक रात्री अडीच वाजता काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. ही बातमी मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा टोलनाक्यावर आलो. पण सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. कोणत्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या