Video : गायीचे शेण विकून बांधला १ कोटीचा बंगला!

सांगोला : सोशल मीडियावर एका शेतक-याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शेतक-याने चक्क गायीच्या शेणापासून (cow dung) १ कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. त्या बंगल्याचे नाव गोधन निवास असे ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्याने केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


सांगोली तालुक्यातील इमडेवाडीत राहणारे शेतकरी प्रकाश नेमाडे यांच्या कर्तृत्ववान गोष्टीची चर्चा सगळीकडे होत आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ४ एकर जमिन होती. पण पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना या जमिनीत शेती करणे शक्य होत नव्हते. त्यानंतर त्यांनी गायीचे दूध विकण्याचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला त्यांच्याकडे १ गाय होती. गावोगावी जावून दूध विकले. आता तब्बल १५० गायी त्यांच्याकडे आहेत. त्यांनी दुधासोबत गायीचे शेण सुद्धा विकण्याचा व्यवसाय सुरू केला.





शेतीमध्ये आता रासायनिक खतांऐवजी लोक सेंद्रिय खतांचा वापर करू लागले आहेत. शिवाय गोबर गॅस प्लांट सुद्धा आहेतच. या नव्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर शेणाची गरज भासते. अन् ही गरज प्रकाश नेमाडे यांनी ओळखून शेण विकण्याचा त्यांनी नवीन व्यवसाय सुरु केला. आज ते १ कोटीच्या बंगल्याचे मालक आहेत. गावातल्या शेतकऱ्याची ही कमाल तरुणांना प्रेरित करणारी आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील