Video : गायीचे शेण विकून बांधला १ कोटीचा बंगला!

सांगोला : सोशल मीडियावर एका शेतक-याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शेतक-याने चक्क गायीच्या शेणापासून (cow dung) १ कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. त्या बंगल्याचे नाव गोधन निवास असे ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्याने केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


सांगोली तालुक्यातील इमडेवाडीत राहणारे शेतकरी प्रकाश नेमाडे यांच्या कर्तृत्ववान गोष्टीची चर्चा सगळीकडे होत आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ४ एकर जमिन होती. पण पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना या जमिनीत शेती करणे शक्य होत नव्हते. त्यानंतर त्यांनी गायीचे दूध विकण्याचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला त्यांच्याकडे १ गाय होती. गावोगावी जावून दूध विकले. आता तब्बल १५० गायी त्यांच्याकडे आहेत. त्यांनी दुधासोबत गायीचे शेण सुद्धा विकण्याचा व्यवसाय सुरू केला.





शेतीमध्ये आता रासायनिक खतांऐवजी लोक सेंद्रिय खतांचा वापर करू लागले आहेत. शिवाय गोबर गॅस प्लांट सुद्धा आहेतच. या नव्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर शेणाची गरज भासते. अन् ही गरज प्रकाश नेमाडे यांनी ओळखून शेण विकण्याचा त्यांनी नवीन व्यवसाय सुरु केला. आज ते १ कोटीच्या बंगल्याचे मालक आहेत. गावातल्या शेतकऱ्याची ही कमाल तरुणांना प्रेरित करणारी आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,