Rain Tradition: कायच्या काय! पाऊस पडावा म्हणून गावात दोन मुलांचे लग्न लावून दिले

बंगळूरू: वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी महाराष्ट्रात (Maharashtra) बेडकाचे लग्न लावले जाते. मात्र कर्नाटकातील (Karnataka) मंड्या जिल्ह्यात गंगेनहल्ली गावात भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी चक्क दोन मुलांचे लग्न लावण्यात आले. एक मुलगा वर आणि दुसरा वधू बनला. वधुने साडी, चोळी असा पारंपरिक वेश केला तर नवरदेवही छान पापंरपरिक कपड्यात तयार झाला होता. इतकचं नव्हे तर विवाह सोहळ्यात संपूर्ण गावाला मेजवानीही देण्यात आली.


खरंतर, हे सर्व काहीसे प्रतीकात्मक होते. पावसासाठी गावकऱ्यांनी लग्न आणि मेजवानीची जुनी परंपरा या निमित्ताने साजरी केली. गावात चांगला पाऊस व्हावा यासाठीच हे सर्व काही करण्यात आल्याचे गंगेनहल्ली गावातील लोकांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटकात कमी पाऊस झाल्याची माहितीही त्यांनी दिली.



भारतात ही जुनी परंपरा


कर्नाटकच्या ग्रामीण भागात पावसासाठी दोन तरुणांमध्ये लग्न करण्याची परंपरा फार जुनी आहे. बंगळुरूमध्ये २०१७ मध्ये असाच एक प्रतीकात्मक विवाह झाला होता. लोकांचा असा विश्वास आहे की या प्रकारच्या लग्नामुळे गावातील लोक सुखी आणि समृद्ध होतात.


२०१७ मध्ये मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यानंतर इंदूरच्या मुसाखेडी येथेही अशाचप्रकार दोन तरुणांचे लग्न लावून देण्यात आले होते. दोन्ही मुलांसाठी मंडप सजवण्यात आला आणि दोघांनी सप्तपदी घेतली. त्यात दोन्ही बाजूंनी स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा